नवीन लेखन...

लहान वयात दृष्टिदोष

Vision Problems in young age

आजकाल अगदी लहान वयात मुलांना चष्मे लागतात. पूर्वी चाळीशीनंतरच बहुधा चष्मा वापरावा लागत असे. लहान वयात दृष्टिदोष निर्माण होण्यामागे नेमके काय कारण असावे असा विचार केल्यावर एक महत्वाची गोष्ट लक्षात आली.

शरीरात ५ ज्ञानेंद्रिय असतात. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. ह्यापैकी डोळे सोडून चार ज्ञानेंद्रियांचा विकास गर्भावस्थेत थोडा थोडा झालेला असतो. डोळ्यांचे कार्य मात्र जन्मानंतर सुरु होते. पूर्वी प्रसूती झाल्यानंतर बाळंतिणीसाठी एक विशिष्ट खोली असायची. ह्या खोलीत फारसा उजेड नसायचा, किंबहुना ही खोली जरा अंधारीच असायची. नवजात बालकाच्या डोळ्यांवर आघात करणारा प्रखर प्रकाश तान्ह्या बाळाच्या डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून ह्या खोलीची रचना केली जात असे.

ज्याप्रमाणे तान्ह्या बाळाला झणझणीत ठेचा कोणी खायला देत नाही, फटाक्याची लड त्याच्या जवळपास लावत नाही किंवा फ्रीजचे पाणी किंवा गरमागरम चहा पाजत नाही, त्याचप्रमाणे प्रखर प्रकाशापासूनही त्याचे रक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. हळूहळू बाळाला उजेडाची सवय केली तर कदाचित लहान वयात होणारे दृष्टिदोष टाळता येतील. जुन्या काळातील चालीरीती उगाच प्रचलित नाही झाल्या. त्यामागे सखोल विचार आहे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

वैद्य संतोष जळूकर
+917208777773
drjalukar@akshaypharma.com

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..