नवीन लेखन...

वाट

दाटे विचारांत ओसंडून सैरभैर व्याकुळलेली वाट

वाटेवरी भग्न स्वप्ने उरी घेउनी जन्मली ही पहाट

पहाटे अखेरीस सर कालचा दिस, रेंगाळला सुन्न घाट

घाटावरी पाय ओढीत ही घट्ट धरली पुन्हा वहिवाट

 

धागे कसे जोडले हे असे सांधताना रुतोनी बसावे तिथे

तिथे वाटते सर्व संपून जावे फिरोनी पुन्हा नेमके आठवे

आठवांची ठेव गळकी जणु मनी मेघांचे काजळ दाट

दाटले प्रेम सर्वत्र आहे चालती आंधळे ना ही वाट

 

मनोरंजनी गुंतलो असे कि कुठे जायचे भान उरले कुठे

कुठे घ्यायची भरारी पंख विखरून हाती नुसती पिसे

पिसे राहिले ना कशाचे तरी कशी पायात येते वहिवाट

वहिवाट प्रसवते बीज मर्मबंधात प्रेम, पाउलेच होती वाट

— सुहास तांबे

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..