नवीन लेखन...

उपचार सारे

हात अनेक भवती एक काळजाला भिडत नाही
नाती झाली उदंड, तरी जिवाभावाची साथ नाही

गर्दीचे संमेलन केवढे, पण कोण कुणाला सामील नाही
भेटीगाठींचा वर्षाव सारा, आतड्याला कुणाच्या पीळ नाही

विलगणारे ओठ अगणित. पण हास्याची लकेर नाही
बिलगणाऱ्या शरीरांचा कधी अंत:करणाला स्पर्श नाही

शब्दांचा पाऊस भरपूर पण भिजलेला एकही नाही
विचारांचा वर्षाव तरीही मनाला स्पर्शून नाही.

आण्यांचे व्यवहार सारे त्यात मनाचा व्यापार नाही
सगळे केवळ उपचार त्यात जीवनाचे सार नाही

संपन्नतेचे पेटारे मुबलक त्यात समाधानाची चादर नाही
आपुलकीच्या शोधात फिरणाऱ्या अंतरात्म्याचा आदर नाही

– यतीन सामंत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..