नवीन लेखन...

कवी अनिल यांच्या २ कविता

Two poems by Kavi Anil

जुई

पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती

इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती

 

आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला

ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला

 

तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते सौम्य चांदणे

जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे नितळ रूप देखणे

 

कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानांत झाकून घेत

शुभ्र शुचितेची सौजन्यकांती हिरवे लावण्य लेऊन येत

 

मादकता जाते मार्दवी विरून, सौंदर्य सोज्ज्वळाआड दडते

सोलीव सुखाचे स्वप्नच एक जीवाला जगतेपणी पडते !

कवी अनिल

—————————————–

पावसा पावसा थांब ना थोडा

 

पावसा पावसा थांब ना थोडा

पिळून काढुन न्हालेले केस

बांधु दे एकदा सैल अंबाडा

पावसा पावसा लप ढगात

सागफ़ुलांची कशिदा खडीची

घालु दे तंगशी चोळी अंगात

पावसा पावसा ऊन पडु दे

वाळाया घातला हिरवा शालू

चापूनचोपून तिला नेसू दे

पावसा पावसा पाहा ना जरा

जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने

वेणीत घालाया केला गजरा

पावसा पावसा आडोश्यातुन

साजरा शृंगार रानराणीचा

दुरून न्याहाळ डोळे भरून …

कवी अनिल

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on कवी अनिल यांच्या २ कविता

  1. मला कवि अनिल यांची ” चाललो ” ही कविता पाहीजे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..