नवीन लेखन...

श्री. तुलसी वृदांवन जन्मकथा

तुलसीचे झाड अंगणीं । सर्वांच्या घरातुनी ।।
त्याचे महत्त्व जाणूनी । गृहलक्ष्मीसाठीं ।।१।।

पवित्रता धर्म एक । घर गृहस्थीचे सुख ।।
पवित्रतेचे प्रतीक । तुलसी असे ।।२।।

तुलसीचे झाडास । परमेश्वराचा सहवास ।।
गृहसुख त्या घरास । लाभत असे ।।३।।

तुलसी झाडास मोठेपणा । मिळत असे ‘वर’ मिळोन ।।
कथा ऐकवी चित्त देवून । सकळ जन हो ।। ४।।

राजा नामें जालंदर । होता तो आसुर ।।
स्वभाव त्याचा क्रूर । गरीब जनांसाठी ।। ५ ।।

तयाची पत्नी सती । त्यास पतिव्रता लाभती ।।
महान तिची पतिभक्ति । वृंदा नाम तिचे ।। ६ ।।

पतिसी मानती देव । अर्पूनी त्याचे चरणीं भाव ।।
पुजिती त्यासी सदैव । मनोभावे ।। ७।।

राजाने देवांना जिंकूनी । बंदी त्यांना करूनी ।।
त्रास सर्वांना देवूनी । हा हा:कार माजविला ।। ८।।

प्रत्यक्ष शिव आला लढण्यास । मारण्या जालंदरास ।।
सोडविण्या देवांचा त्रास । त्याचे कडून ।।९।।

अपूरी पडली शिवशक्ती । मरण त्यास न येती ।।
कोण त्यास वाचविती । प्रश्न पडला शिवे ।।१०।।

ब्रह्म आले सत्वर । पूजा करुन विश्वेश्वर ।।
सुचविती उपाय त्यावर । दैत्यास मारण्याचा ।। ११।।

वृंदा आहे सती महान । पतिवृता शक्ती कठीण ।।
त्या शक्तीमुळे रक्षण । दैत्याचे होई ।।१२।।

तिचा पती धर्म । नष्ट करावा हे मर्म ।।
विष्णूसी सांगावे हे कर्म । करणे करिता ।।१३।।

पतिवृता हरण करणेसाठीं । कारस्थान केले जगतजेठीं ।।
दैत्यनाशा पोटीं । घात केला वृंदेचा ।।१४।।

दैत्य रुप घेवूनी । पती आहे हे भासवूनी ।।
पातिवृत्या नष्ट करोनी । वृंदासी फसविले ।। १५।।

प्रकार आला ध्यानीं । पतिधर्म गेला डागळूनी ।।
खिन्न झाली मनी । सती वृंदा ।। १६।।

शाप दिला संतापूनी । मानव जन्म घेवूनी ।।
पत्नी विरहाचे दु:ख मनीं । सहन करावे लागेल ।। १७।।

विष्णू ‘राम’ अवतरला । आजन्म विरह सोसला ।।
दु:खी, कष्टी आला । सीते साठीं ।। १८ ।।

वृंदेचे जेव्हां पावित्र जाई । रक्षणकवच दूर होई ।।
शिव दैत्यास मारण्या येई । त्याच वेळीं ।। १९।।

दु:खाचा डोंगर कोसळला । पति व पतिधर्म गेला ।।
जगण्यास अर्थ न उरला । वृंदेसाठी ।। २०।।

पति वियोग होतां । सती गेली पतिव्रता ।।
परमेश्वर तिज दर्शन देतां । आशिर्वाद दिला ।।२१।।

परमेश्वरांनी वर दिला । तुलसीचे रूप मिळेल तिला ।।
विष्णुचे सानिध्य लाभण्याला । तिचे भोवतीं ।।२२।।

घरातील अंगण । त्यांत तुलसी वृंदावन ।।
आनंद सुख समाधान । त्या घरी वसे ।।२३।।

पूजा आभिषेकांतील तीर्थ । अर्पूनी जल वृंदावनांत ।।
भाव भक्तीचे मनोरथ । तुलसी ठायी ठेवावे ।। २४।।

सौभाग्यवती ही सति । पतिव्रतेची एक शक्ति ।।
तुळशीच्या आशीर्वादे मिळती । गृहलक्ष्मींना ।।२५।।

तुळसी अंगणीं वसे । संरक्षण वलय असे ।।
दु:ख ना तेथे दिसे । त्या घरामाजीं ।।२६।।

( तुलसी विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत )
शुभ भवतू

डॉ. भगवान नागापूरकर
८- २५११८३

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..