नवीन लेखन...

तू कळ्या दिल्या की फुलं

तू कळ्या दिल्या की फुलं
पानगळ मात्र झाली
विरल्या मनात तुझी
चाहूल बंदिस्त झाली
तू शब्द दिले की अर्थ
घालमेल वाक्यांची झाली
हळव्या आठवणीत तुझी
ओळख खोलवर रुतली
तू तोडलस की फटकारलस
जीवाची घालमेल उरली
अलगद हृदयात तुझी
सय हलकेच मोहरली
तुझा स्पर्श तुझी मिठी
आभास अंतरी विरली
मोहक चांदण्यात तुझी
ओळख अनामिक झाली
तू होतास की नव्हतास
मण्यांची माळ आल्हाद तुटली
विणलेल्या हारात तुझी
ओढ अवचित तुटून गेली
तू असाही तू तसाही
भावनांची गाठ विणली
ऋणानुबंध मागचे उरले
तुझी वाट वेगळी झाली
तू बहरला तू मोहरला
पापणींची कढ ओल भिजली
फुलांच्या गंधित बागेत मग
तुझी रेशीमगाठ अलवार सुटली
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..