नवीन लेखन...

व्यवहार

पहाटेच्या वेळी इन्स्पेक्टर मोहिते मिरज स्टेशन वर गाडीतून उतरले . पाटील व त्यांचा मुलगा केदार त्यांच्या गाडीची वाट पाहात प्लॅटफॉर्म वर उभेच होते . खरे तर इ . मोहित्यांना सरळ सरकारी विश्राम गृहात जाण्याची ईच्छा होती . परंतु पाटीलांच्या आग्रहाखातर सकाळच्या चहासाठी त्यांनी पाटीलांकडे जाणे कबूल केले होते . केदारने धावत जाऊन त्यांच्या हातातील बॅग घेतली व ते तिघेही केदारच्या सफारी गाडीत जाऊन बसले.पाटील व केदार बरेच आनंदी दिसत होते . त्यांच्याकडे पाहून इ . मोहितेही रिलॅक्स झालें होते . काही मिनिटातच गाडी पाटलांच्या घराच्या दरवाज्याशी येऊन उभी राहिली . गाडीतून उतरता उतरताच , गेल्या काही वर्षात पाटलांकडचा झालेला बदल मोहित्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही . छोटेसे टुमदार असलेले पाटलानंचे घर आत बऱ्यापैकी अद्यतन बंगल्यात रूपांतरित झालें होते . जुन्या स्कूटर च्या ठिकाणी नवीन सफारी दारी उभी होती . बैठकीच्या खोलीतील लाकडी खुर्च्याच्या जागी सोफा विराजमान होता . जेवणासाठी ठेवले जाणाऱ्या पाटाच्या जागी डायनिंग टेबलं उभे होते आणि मुख्य म्हणजे निरागस , आईच्या मागे मागे फिरून आईला सांभाळण्याचा प्रयत्न करणारा केदार आज धावपळ करून मोहित्यांच्या पाहुणचारा ची सोय पाहात होता . त्याला असा पाहून आणि पाटलांची बदलेली परिस्थिती पाहून मोहिते मनोमनी खुश झालें . सात वर्षांपूर्वीचे मुलीला न्याय मिळावा म्हणून दर दोन दिवसांनी रडत पोलिस चौकीत येणारे पाटील , पाटलीणबाई व केदार मोहित्यांना आठवले . साहजिकच होते , एकुलत्या एका शिकल्यासवरलेल्या मुलीचा माधवीचा खून झाला होता . तिला न्याय मिळावा म्हणून पाटील अक्षरशः जेवण खाण विसरून धडपडत होते . मुलीचं लग्न होऊन जेमतेम वर्ष झालं होत . तिचा खून होऊनही पोलिसांनी संशयाखातर सुद्धा कोणाला ताब्यात घेतले नव्हते . समोरची पार्टी जोरदार होती . कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन इन्स्पेक्टर सातपुत्यांनी पंचनामा केला होता . बराच बोभाटा झाला , इ . सातपुत्यांची रातोरात त्या चौकीवरून हकालपट्टी करण्यात आली होती , सोबत तीन हवालदारांची सुद्धा बदली झाली होती . सातपुत्यांच्या जागी इ . मोहिते आले होते आणि त्यांनी पुढील तपासासाठी कागद पत्रे हाती घेतली होती . त्यांचा अभ्यास करताच पुरावे नष्ट झाल्याचे मोहित्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नव्हता . भर दुपारी राहत्या घरात गळा कापून झालेल्या खुनाचे हत्यार सापडले नव्हते , भिंतीवर कुठेही उडालेले रक्ताचे डाग नाही , घरातील कुठल्याही वस्तूंवर माधवीशिवाय कोणाचेच finger prints नाही , नेमका बिल्डिंगचा Watchman रजेवर , CCTV कार्यरत नाही . काहीच पुरावा नाही . मोहित्यांनी डोक्याला हात लावला होता कारण मुलीला न्याय मिळवून द्या हो साहेब म्हणून काकुळतीने आर्जव करणारे आईबाप त्यांच्या नजरेसमोरून हालत नव्हते . मोहित्यांनी नव्याने तपास चालू केला . तपासाच्या कामामुळे त्यांचे पाटील कुटुंबियांना वरचेवर भेटणे होत होते . व हळूहळू त्यांची पाटील कुटुंबाशी चांगली ओळख झाली होती . काही काळात तपास बराच पुढे गेला होता बरेचसे धागेदोरे जुळत आले होत परंतु समोरची पार्टी कोर्टात केस उभीच होऊ देत नव्हती . अशातच इ . मोहित्यांची जळगावला बदली झाली व त्यांनी मिरज सोडले होते . त्यांना पाटील कुटुंबियांसाठी खूप सहानुभूती वाटत असे परंतु कोर्टाच्या मॅटर मध्ये ते काहीच करू शकत नव्हते . समोरची पार्टी जबरदस्त होती त्यांच्या समोर पाटलांचा टिकाव लागणे कठीण होते . मोहित्यांना फार वाईट वाटत असे . सरतेशेवटी सात वर्षांनंतर कोर्टात केस उभी राहणार होती ह्यावेळी काही भक्कम पुरावे मोहिते कोर्टात सादर करून पाटलांना म्हणजे माधवीला न्याय मिळवून देण्याच्या पूर्ण तयारीने मिरजला पोहचले होते . काही वेळ गप्पा झाल्या , चहा पाणी झाले , इ . मोहिते सरकारी विश्राम गृहासाठी निघाले . निघण्यापूर्वी त्यांनी विषय काढला व कोर्टात आपण कसा stand घ्यायचा ह्याची चर्चा करायला सुरुवात केली . इतका वेळ कुठेही न दिसलेल्या पाटलीण बाई दाराआड येऊन उभ्या राहिलेल्या मोहित्यांनी पहिल्या . त्यांना पाहन पाटील थोडे गोंधळले . केदार ही गोरामोरा झाला . मोहित्यांच्या पोलिसी नजरेने हे सगळे पटकन हेरले . मोहिते म्हणाले , पाटील काय आहे ? त्या लोकांनी तुम्हाला पुन्हा धमकाविले की काय ? ते इथे आले होते ? पोलिसांना तुम्ही कळवले की नाही ? पाटील हळू आवाजात म्हणाले , तसे नाही साहेब . पण काय आहे ना की … पाटील अडखळले . केदार ने त्यांचे संभाषण पुढे नेले , साहेब आम्ही झालें गेले विसरून जायचे ठरीवले आहे . काय आहे भावजी आणि त्यांचे वडील आले होते . त्याला मध्येच थांबवत पाटील म्हणाले , साहेब , माधवी तर गेली . आमचं नुकसान होऊन गेल , ती काही परत येणार नाही . जावईबापू आणि त्यांच्या वडिलांनी केदारची आणि घराची जबाबदारी उचलली आहे . केदारला ही छोटीसी factory त्यांनीच घालून दिली इतरही बऱ्याच गोष्टी केल्या . बोलल्याप्रमाणे बराच व्यवहार त्यांनी पूर्ण केला . त्यामुळे आम्हीच कोर्टात जाऊन केस मागे घ्यायचे ठरविले . म्हणून आत्ता केस उभी राहिली आहे . आपण हा विषय इथेच संपवायचा आहे … पाटील इ . मोहित्यांसमोर हात जोडून उभे होते . पाटलीण बाईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते . केदार गप्प उभा होता .. वा पाटील , मुलीच्या जिवाची किती बोली लावलीत ? छान व्यवहार केलात . असे म्हणून इ . मोहिते ताड्कन पाटलांच्या घराबाहेर पडले . केदार घाईघाईने गाडी घेऊन त्यांच्या समोर उभा राहिला . त्याच्याकडे न बघता मोहित्यांनी रिक्षा थांबिवली . रिक्षात बसता बसता त्यांनी पाटलांच्या घराकडे नजर टाकली . घरातील सर्व बदलांचे कारण त्यांच्या लक्षात आले होते.

पुन्हा एकदा कायद्यातील पळवाटा आणि न्यायालयात होणाऱ्या विलंबाने अजून एका माधवीचा बळी घेतला होता … न जाणे अशी अजून किती जीवांची बोली लागेल ? … अजून असे किती व्यवहार होतील ? ….. मोहित्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले ………..

–सौ वैजयंती गुप्ते
गांधीनगर (गुजरात)
मो . ९६३८३९३७७९

(उत्कर्षवृत्त चां.का.प्रभु सभेचे मुखपत्र या मासिकातून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..