नवीन लेखन...

मुंबईतील ट्रामगाड्या

१८७४ मध्ये मुंबईत ट्रामगाडयांची वाहतूक सुरु झाली. ही ट्राम लोखंडी रुळावरुन चालत असे. मोठया रस्त्यांवरच नव्हे तर गल्लीबोळांतून देखील फिरणारी ही गाडी गरीबांचे वाहन मानली जात होती. कितीही अंतर जायचे असेल तरीही अर्ध्या ते दोन आण्यांत प्रवाश्यांचे काम भागे.

ट्राम ओढण्यासाठी घोडे जुंपावे लागत. प्रथम एका घोड्याची व नंतर दोन घोड्यांच्या ट्राम अस्तित्वात आल्या. ट्राम गाडयांची वाहतूक सकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत चालू असे. घोड्यांच्या ट्राम गाड्या १९०७ पर्यंत आपले काम बजावीत होत्या.

१९०७ च्या मे महिन्यात विजेच्या शक्तीने ट्रामगाड्या चालू करण्यात आल्या. घोड्यांऐवजी पेंटाग्राफ गाडीच्या छपरावर लावून तो वरील विजेच्या तारेस जोडलेला असे आणि त्याद्वारे गाडीला विजेचा पुरवठा होत असे. विजेच्या ट्रामगाड्यांसाठी ठराविक थांबे असत आणि तेथे तश्या पाट्या लावलेल्या असत. घोडयांच्या ट्रामगाडयांना अशी सोय नसल्याने प्रवासी हात दाखवून हवी तेथे ट्राम थांबवत. ट्रामगाड्या एकमजली आणि दुमजलीही असत. त्यांचा वेग मात्र फारच मर्यादित असे.

मुंबईच्या वेगात वाढ झाल्यानंतर कालांतराने मुंबईतील ही ट्रामवाहतूक बंद पडली. आता BEST ची बस वाहतूक आहे. मात्र ट्राममधून फिरण्यातला तो आनंद अजूनही विसरता येणारा नाही.

[a-link] [31520] (“मुंबईतील ट्राम गाडया व जुन्या जमान्यातील वाहने!” हा श्री जगदीश पटवर्धन यांचा लेख वाचा. ) [/a-link]

— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..