नवीन लेखन...

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी

बुधवार दिनांक १२ जुलै २०१७ रोजी दादरहून खारला जाण्यासाठी सकाळी ११ वाजता टॅक्सीने निघालो आणि खारला तब्बल एका तासाने पोहोचलो.

आज प्रमुख शहरांमधील रोज वाढणारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आणि पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लक्षात घेता ती तोकडी पडते की काय असे चित्र बघावयास मिळते किंवा शहरातील नागरिकांस सर्व दृष्टीने सोयीची नाही असे स्पष्ट होते. तरी बरं मुंबईतील बहुसंख्य नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करून घेतात, नाही तर…! आजच्या घडीला शहरात वाहनांची एवढी कोंडी होते की एखाद्या ठराविक स्थानापर्यंत पोहचण्यास विलंब होतो.

मुंबईत वाहनांच्या संख्येत दररोज भर पडत असून सध्या तब्बल दोन कोटींहून अधिक वाहने मुंबईत आहेत. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण आणणे हाच उपाय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. पण राजकीय इच्छाशक्ती दाखवून हा कठोर निर्णय घेतला जाणार का आणि त्याची अंमलबजावणी करता येईल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मुंबईत सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आणि दोन कोटी वाहने असून त्यात दररोज भर पडत आहे. राज्यभरातून राजकीय, उद्योग, शासकीय व अन्य क्षेत्रातील मंडळी आपली वाहने घेऊन मुंबईत कामासाठी येत असतात आणि त्यामुळेही वाहनांची संख्या वाढते.

१९९१ मध्ये फक्त २२ लाख असलेली खासगी वाहनांची प्रवासी संख्या आज ६० ते ६५ लाखांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. पण  रस्त्यावरच्या जागेत केवळ ७ टक्के एवढीच भर पडली आहे. शहरात रस्ते बांधण्यासाठी किंवा त्यांची रुंदी वाढवण्यासाठी अजिबात जागा नाही. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडी अटळ आहे.

रस्त्यांवर दुतर्फा करण्यात येणाऱ्या पार्किंगमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या जागेत झालेली कपात, वाहतुकीचे नियम न पाळणे, सिग्नलचा अवमान, मन मानेल तेथे वाहने वळवणे, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे अशा बेशिस्तीमुळे एकूण वाहतुकीचा वेग मंदावला आहे. या सर्वाचा परिणाम ध्वनिप्रदुशाणात होत आहे आणि अपरिहार्यतेने पर्यावरणावरही होत आहे. वर म्हटल्याप्रमाणे अशा कोंडीचा सर्वात जास्त फटका बेस्टच्या सेवेला बसला आहे. बसेसच्या फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडून बेस्टवर विश्वासार्हता गमावण्याची पाळी आली आहे. तसेच पूर्वी बेस्टवर अवलंबून असलेल्या लोकांनी दुचाकी, चारचाकी किंवा रेल्वे हे पर्याय निवडले आहेत. त्याचबरोबर या सर्व वाढत्या संख्येतील वाहनांना पार्किंगसाठी तिप्पट जागा लागते. परंतु त्यावर कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही, हे शहराचे फार मोठे दुर्दैव आहे. स्वयंशिस्त हाच वाहतूक कोंडीवर उतारा आहे.

सध्या मुंबईत बेसुमार गाडय़ा व तेवढय़ाच दुचाकी रस्त्यांवर पार्क केलेल्या दिसतात. त्यामुळे सुमारे बरीच एकर जागा केवळ गाडय़ांसाठी फुकट वापरली जाते. दुचाकी, टॅक्सी, रिक्षा, ट्रॅक्स, बसेस, टँकर्स या सर्वासाठी कितीतरी एकर एवढी बहुमोल जागा फुकट वापरली जाते.

सध्या प्रत्येक कुटुंबात सरासरी दोन कार आहेत. त्यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे. एका कुटुंबात एकच कार हवी. मुंबईत जागा नसल्याने अवैध पार्किंग वाढत असून ही समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या शहरात उग्र होताना दिसते. रोज सकाळी शेकडो वाहने रस्त्यावर येतात तीच परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडी करतात.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..