नवीन लेखन...

तिची आत्महत्त्या…

ती आत्महत्त्या  करताच समाज तिच्याच

चारित्र्यावर प्रश्न चिन्ह लावून मोकळा होत असतो…

पण तिने आत्महत्त्या करण्यापूर्वी

किती रात्री जागून काढल्या असतील,

किती उश्या तिच्या अश्रुंनी ओल्या झाल्या असतील,

कित्येकदा मनातल्या मनात ती मेलीही असेल

याचा विचार कोणी कधीच करीत नाही…

प्रत्येकाला तिच्या मृत्यूचे कारण जाणण्यात रस असतो…

ती गेल्याचे दु:ख फारच थोड्यांना असतं …

बाकीच्यांना तो मनस्तापच वाटत असतो…

कोण म्हणतं तिचं प्रेमप्रकरण असेल,

कोण म्हणतं तिचा प्रेमभंग झाला असेल,

कोण म्हणतं ती गरोदर असेल,

कोण म्हणतं तिचे लग्न ठरत नव्हतं,

कोण म्हणतं तिच मन फारच हळवं होतं…

पण खरंच हिच कारणे असतात का तिच्या आत्महत्तेमागे ..?

तिच्या आत्महत्तेची खरी कारणे कधीच येत नाहीत का जगासमोर…

पुरुषांना जन्माला घालणारी स्त्री

त्याच पुरुषांच्या अहंकाराची बळी ठरत असते का ?

ठरत असेल तर हे वेळीच थांबायला हवे !

तिची आत्महत्त्या टाळायला हवी !

नाहीतर… तिच्या अभावी…

भविष्यात कित्येक पुरुषच

आत्महत्त्या करताना दिसतील…

 

©कवी ‌– निलेश बामणे ( एन.डी.) 18-02-24

 

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..