नवीन लेखन...

पर्यावरणपूरक घरांची गरज

वाढत जाणाऱ्या लोकसंख्येबरोबर मूलभूत गरजा देखील वाढत जातात. त्याचा ताण शासकीय व्यवस्थेवर येतो. पाण्याचा वापर जसा वाढत असतो तसाच त्याच्या वापरामुळे सांडपाणी आणि मैला-पाणी वाहून नेण्याची व्यवस्था देखील वाढवावी लागते. पाणी पुरवठ्यासाठी बोअर वेल, टाकी आणि पंपाची व्यवस्था करता येते; मात्र तयार होणारे सांडपाणी शहराच्या मैला-पाणी वाहून नेणाऱ्या व्यवस्थेत सोडावे लागते. कचरा संकलनाचीही वेगळी व्यवस्था करावी लागते. हल्ली नव्यानं बांधल्या जात असलेल्या निवासी संकुलात कचरा संकलन करून त्याद्वारे खत निर्मिती आणि निर्मूलन करणे अनिवार्य झालं आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी, अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी, उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर करून पर्यावरण पूरक नगररचना आणि बांधकाम होणं ही काळाची गरज झाली आहे.

महानगरांचा चौफेर होत जाणारा विकास, औद्योगिकीकरण, मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, वाढत जाणारी लोकसंख्या, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे पर्यावरणाचा समतोल राखणं सर्वच ठिकाणी शक्य होत नसल्याचं दिसून येत आहे. यामुळे वीज, पाणी पुरवठा, रस्ते, निवासव्यवस्था, शुद्ध हवा या सर्वांवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होत असताना आपण पाहत आहोत. महानगरांमध्ये अनेक ठिकाणी उभ्या होत असलेल्या टोलेजंग इमारती, मोकळ्या जागांचा, बागांचा, क्रीडांगणांचा अभाव यामुळे वीज, पाणी, निवासव्यवस्था, शुद्ध हवा अशा अनेक मूलभूत गरजांवर मर्यादा येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. पर्यावरण पूरक घर बांधणी आणि बांधकाम ही संकल्पना सद्य:स्थितीत नगर रचनेचा अविभाज्य घटक बनत आहे. ईको-फ्रेंडली या नावाने सर्वश्रूत असणाऱ्या या संकल्पनेला प्राधान्य देण्यामागे अनेक महत्वाच्या बाबी आहेत. नगररचना आणि बांधकामासाठी लागणारे घटक अथवा लागणारा माल निवडताना पर्यावरणाचा अभ्यासपूर्वक विचार होणं आवश्यक असतं.

पर्यावरणपूरक नगररचना आणि बांधकाम करण्यासाठी पुनर्निर्मित स्त्रोतांचा वापर केला जाणे गरजेचं असतं. सौर ऊर्जा, पाणी, नैसर्गिक साधनं, घर बांधणी आणि बांधकाम करण्यासाठी लागणारा कच्चा माल, पर्यावरणाला अनुसरून असला पाहिजे. अशा कामात सभोवतालचं वातावरण, नैसर्गिक हवा, अंतर्मन आनंदी राहू शकेल. मनाचं आरोग्य अबाधित कसं राहील हे पाहणं जरुरीचं असतं. यासाठी घरात हवा खेळती राहणं आवश्यक असतं. बांधकामात नैसर्गिक घटकांवर परिणाम करणाऱ्या ऊर्जेचा वापर कमी केला गेला पाहिजे. ऊर्जा आणि पाणी यांचा वापर केवळ गरजेपुरताच केला गेला पाहिजे. यामुळे इमारतींमध्ये सुमारे ३० ते ४० टक्के ऊर्जेची आणि पाण्याची बचत होते. अशा ठिकाणचे वास्तव्य अधिक आरामदायक असतं. नैसर्गिक स्त्रोत वापरल्यामुळे मानसिक आरोग्य टिकून राहतं. घराची अथवा कोणत्याही इमारतींची रचना करताना दारे, खिडक्या यांचा प्राधान्यक्रमानं नैसर्गिक हवा आणि उजेड योग्य तऱ्हेने उपलब्ध होण्यासाठी विचार करावा लागतो॰ यामुळे घरातील तापमान काही अंशी स्थिर ठेवता येतं. सूर्य प्रकाशाचं तापमान आणि नैसर्गिक थंड हवा याचाही समतोल पर्यावरण पूरक रचना केल्यावर साधता येतो. पर्यावरण पूरक घरं ही निसर्गाशी आपली जवळीकता वाढवत असतात. सद्य:स्थितीत प्रदूषण कमी करून चांगलं पर्यावरण सांभाळण्यासाठी अशा घरांची निर्मिती करणं गरजेचं आहे.

विद्यावाचस्पती विद्यानंद

ईमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..