नवीन लेखन...

फुलता पारिजात

सांगू कशी वाऱ्याला थांबव तुझे आघात गारवा फार सुखावे झोम्बे नुसता झंझावात सांगू कशी रजनीला उतरू नकोस चांदण्यात सारे शीतल वाटे मन फुलता पारिजात सांगू कशी धरतीला न्हाऊ नकोस पावसात मृदगंध अत्तर कोठे सापडेल या जगतात सांगू कशी मनाला झुलू नकोस आनंदात सारे घडे मनाजोगे संपेलच विरहाची रात्र!! — वर्षा कदम.

प्रीत

अशा झुंजूमुंजू समयी सखया याद तुझी यावी केशरी लाली नभाची गाली माझ्या चढावी कलकलाट कोकिळेचा तीव्र असा होत जाई आठवे ती हुरहूर सारी मन कातर कातर होई ओढ अशी कशी ही बाई जग सारे विसरून जाई कधी पुन्हा भेट अपुली जी होता होत नाही ये एकदा तू परतुनी मनी चिंब ओलावा लेउनी शुष्क कोरडी ही माती […]

एक नातं

एका धाग्याची रे वीण एका नात्यात रे जिणं गाठ बांधून पदरी आले आता तुझ्या घरी एका खोप्याचं जगणं तुझं माझं काही देणं जीव जीवाला जागलं सारं मायेनं झाकलं एका दु:ख काही घाव दुजा सारखाच भाव आता नाही रं वेगळं सारं मीपण गळं नातं नवं, नवी दिठी पर अशी कायम राहो विटी कुणी हटलं, म्हटलं तरी राहो […]

आठवण

आज सख्या रे मी खरेच तळमळले आठवणीने तुझिया आतून हळहळले एक लकेर ‘त्या’गाण्याची अन क्षणात प्रीतीचे अपुले ऋतू मज स्मरले तो किनारा एक सळसळता अन वाळूत दोघांचे होते ठसे उमटलेले मूक एक शेवटची भेट अन हातात हात अखेरचे घट्ट गुंफलेले पापण्यांच्या कडा ओलेत्या अन चिंब धारा त्यात आपण भिजलेले किती रे ऋतुमागून ऋतू हे सरले आहे […]

नवी खोपी

आज नव्या घरात येऊन 10 दिवस झाले. अजूनही घर ओळखीचं असं झालं नाही… सामान जुनंच आहे… तरीही नवीन ठिकाणी हात सरसावत नाही. जुने शेजारी, जुन्या वाण्याचा अजूनही कुठे कुठे भास होतो… भाजीवाल्यापासून गिरणीपर्यंत सगळेच चेहरे अनोळखी आहेत.. ते मला नि मी त्यांना कोण ही नवी बया? हा एकच सवाल आहे… भिंतीसुद्धा बोलक्या असतात… त्या आधीच्या घरी […]

ती गेली तेव्हा

ती गेली सोडून आम्हां कसे सोबती जाऊ सांगा रहावं लागे टिपून आसू मागे सारे सावरायला किती काय नि किती काय गोळा तिने केले असते करू काय या सर्वांचे कुठे जाऊ सांगा पुसायला? तुझा लेक शोधतो आई कुठे आत्या, काकू कि मावशीत तू दिसे? कुणातच नसे तुझी छवी कसे समजावू,सांभाळू अजाण लेकराला? सुगरणीविना चूल मुकी दिसे तांब्या […]

चला जगूया

किती किती घाई आम्हां असते पहा ऊर फुटेस्तोवर सारे धावतो पहा दिस आजचा जरा जगून ही घ्या येत नाही आजचा क्षण रे उद्या किती सारे राहिलेले पाहूनही घ्या किती सारे उरलेले लिहूनही घ्या वेळ कधी कुणासाठी फिरे ना पुन्हा वयही जे जाई पुढे मागे सरेना किती चवीने जिभेचे चोचले केले काही आहे खायचे, काही राहून गेले […]

इतके सहज

एक श्वास सरून दुसरा सुरु व्हावा इतकं सहज सोपं सारं जीव प्रवाही वाहत जावा एकरूप एकतान सृष्टीशी मिसळून यावा नकोत मीपणाचे मुलामे माज पुरता विरघळून जावा एकला जीव आला गेला सारा खेळ येथ खेळावा हार जीत होते जाते इथेच अहं सोडावा चोच आहे चारा येईल हा विश्वास धरावा इवल्याशा खळगीसाठी जीव कुणाचा न दुखवावा सरतील ऋतू […]

थोडे तुझे – माझे

रोज रोज तेचं तेचं लाडू नकोत गोडाला कधीतरी चवीसाठी ठेचा हवाच ठसक्याला तसेच आहे आयुष्यात लावून घेऊ नये मनाला थोडे तुझे थोडे माझे घेऊन लागू प्रवासाला थोडे दिवस शांत शांत घरात राहिलं अबोला चांगलेच असते वादापेक्षा काहीच आपण न बोला वेळ जातो तसे वाटते उगीच बोललो जीवाला जाऊदेत सोडून देऊ सारे काही वेळेला आपण सारे विसरतोही […]

माफी

जिव्हाळा नि आपुलकी जा! तूझ्या वाट्यास नाही तुझ्याबद्दल लिहून मी का संपवू लेखणीची शाई आता पुन्हा मवाळ झालास आलासच ना माझ्या दारी कितीही कारले गुळात भिजले तरीही कडू चव सोडणार नाही इतके घाव वर्मी बसले भळभळती जखम ठायीठायी फुंकर घालण्या उशीर झाला आता तुज कधीच माफी नाही जाऊ द्या, माफी देऊ, सोडून देऊ सारे कमलपत्री म्हणणे […]

1 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..