नवीन लेखन...

स्मरणगाथा : ४ 

समजा ,
तुम्ही लेखक किंवा लेखिका आहात .
तुमचं पहिलंच पुस्तक चांगलं झालंय .
तुम्हाला मानधन मिळालंय .
आणि प्रकाशक सांगतोय की आणखी काही लेखन करा , आपण तुमची सगळी पुस्तकं प्रकाशित करू .

तर तुम्ही काय कराल ?

हातातली सगळी कामं दूर ठेवून लेखनकामाठी करायला लागाल की चक्क लेखनसंन्यास घ्याल ?

तेच तर सांगतोय ना …

सांगायलाच हवं सगळं …

बरोबर २९ वर्षांपूर्वी म्हणजे १९९६ मध्ये एक पुस्तक प्रकाशित झालं होतं .

पुस्तक बालवाङ्गमय प्रकारातील होतं . त्याचं शीर्षक होतं :
सहलीत सापडलेला खजिना
आणि लेखिका होत्या :
सौ . ऋचा श्रीकृष्ण जोशी

पुस्तक पर्यावरण विषयावरचं होतं .

पण गोष्टीवेल्हाळ भाषा , अवतीभवतीच्या खोडकर , शंकेखोर आणि एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या मुलांचे यथार्थ वास्तववादी चित्रण , त्यातून उमलत जाणारी , औत्सुक्यपूर्ण कथा , मनोरंजनाबरोबर मुलांच्या पर्यावरणीय जाणिवांचा मांडलेला विचार आणि कुतूहल वाढवणारी आशयघन लेखनशैली !
मुलांना आकर्षित करणारं मुखपृष्ठ .

एव्हढं सगळं असताना लेखिकेनं चक्क लेखनसंन्यास घेतला .

लेखनासाठी मागणी होती , पुस्तक चांगलं चाललं होतं , नव्या पुस्तकासाठी प्रकाशकानं आग्रह धरला होता .

पण लेखिकेने लेखनसंन्यास घेतला होता .
कारण ,
समाजकार्य म्हणून असणारी अल्प मानधनाची नोकरी सांभाळून तिला मुलांना घडवायचं होतं .
मुलांवर चांगले संस्कार करायचे होते .
आदर्श गृहिणीची कर्तव्ये पार पडायची होती .

आणि लेखक असणाऱ्या नवऱ्याच्या शब्दांना शीर्षरेषा म्हणून खंबीरपणे पाठबळ द्यायचं होतं.

डेमी साईज मधील सुमारे साडेपाच हजार छापील पृष्ठसंख्या होईल इतकं , नवऱ्याचं लेखन आपल्या मोत्यासारख्या सुंदर अक्षरात मुद्रणप्रत म्हणून लिहायचं होतं.

मानधनातील धन हा शब्द अनेक वेळेला हरवल्यानं येणाऱ्या नवऱ्याच्या वैफल्याला हसतमुखानं सावरायचं होतं .

लेखक असणाऱ्या नवऱ्याच्या पुरस्कार समारंभांना , सत्कार समारंभांना उपस्थित राहून कौतुकसोहळा अनुभवायचा होता .
हे सगळं अगदी सहजस्वभावानं , आनंदानं करायचं होतं .

‘स्व’ ला विसरून !

यामुळंच तर डॉ. श्रीकृष्ण जोशी ला स्वतःची ओळख अधिक ठळक करता आली .

त्या कृतज्ञतेपोटी स्मरणगाथेतील ही चार अक्षरं , सौ . ऋचासाठी !

तिच्या लेखनसंन्यासाची ही चित्तरकथा , अविस्मरणीय आणि प्रेरणादायी !!!

— डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
८९५१९०६७०१
२७ जुलै २०२५
————-
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 150 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..