नवीन लेखन...

शब्दनाद – वाजले किती?

वाजले किती हा निदान आपल्या मुंबईकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न. शहरी आयुष्यच घड्याळाच्या काट्याला बांधले गेल्याने हा प्रश्न आपण स्वतःला किंवा दुसऱ्याला विचारणे अत्यंत स्वाभाविक आहे.

पण वेळ वाजताना कधी ऐकलीय का?
मग वेळेला ‘वाजले’ हा शब्द का वापरला जातो?

तर मित्रानो या ‘वाजले’चे मूळ आपल्या प्राचीन संस्कृतीत आहे. घड्याळांचा शोध लागण्यापूर्वी गावात किंवा नगरात लोकांना वेळेची जाणीव करून देण्यासाठी एक मोठी पितळेची थाळी वाजवायची पद्धत होती. दोन ची वेळ झाली असता दोनदा ती थाळी वाजवायची आणि बाराची झाली असता बारा वेळा. इथेच ‘वाजले किती ?’ या वाक्याने जन्म घेतला आणि पुढे घड्याळाचा शोध लागल्यावर तरी हा वाक्प्रयोग पुढे चालू राहिला.

जाता जाता –

गावात वेळ दर्शवण्यासाठी जी पितळेची थाळी वाजवत त्या थाळीला फारसीमध्ये ‘तश्त’ असे म्हणतात. याच ‘तश्त’ चा बोलीभाषेत ‘तस्त’ असा अपभ्रंश झाला व पुढे कालांतराने त्याचाच ‘तास’ झाला. ‘किती तास झाले?’ याचा इतिहास असा आहे. ( इंग्रजी Dish पण या वरूनच आला असावा )

‘घड्याळ’ शब्द सरळ सरळ ‘घटिका’ या शब्दावरून आला आहे तर गुजराती ‘कलाक’ हा शब्द इंग्रजी ‘Clock’ चा अपभ्रंश आहे आणि हिंदीतील ‘कितना घंटा’ हा प्रश्न सरळ सरळ Church Bell वरून आला आहे.

— गणेश साळुंखे
९३२१८११०९१

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..