नवीन लेखन...

शब्दावरुन पाच चारोळ्या

*चारोळी क्रमांक १*

*शब्द:अक्षर,शब्द,वाक्य,काव्य*
अक्षर अर्थपुर्ण जुळताच शब्द
शब्दा-शब्दांनी बनले वाक्य
वाक्य योजता होते काव्य
काव्यात असे लयबद्ध यमक शक्य

*चारोळी क्रमांक २*

*शब्द:तास,दिवस,मास,वर्ष*
तास चोवीस होताच होई दिवस
दिवसांचे गणन तीस होता एक मास
मास होताच बारा सरे वर्ष
वर्षाची सरत्या बात असते खास

*चारोळी क्रमांक ३*

*शब्द:बालपण,तरुणपण,प्रौढपण,म्हातारपण*
बालपणीच्या गमती नसती तरुणपणी।।
तारुण्यातली कर्तव्य ,पायाभरणी प्रौढपणाची।।
प्रौढावस्थेत चाहूल वार्धक्याची।।
वार्धक्यास उपमा बालपणाची।।

*चारोळी क्रमांक ४*

*शब्द:अंडी,अळी,कोष,फुलपाखरू*
अंड्या-अंड्यातुन निघाली इवली अळी।।
अळीचेच रुपांतर होई कोषातूनी।।
कोषभेदूनी बाहेर पडे फुलपाखरू।।
फुलपाखरू स्वच्छंदी उडते फुलाफुलातुनी।।

*चारोळी क्रमांक ५*

* शब्द:जल,जलचर,
मत्स्य,मत्स्यकन्या *

जलात विहरती जलचर।।
जलचरात देखणे किती मत्स्य।।
मत्स्यरुपी आवडे मज मत्स्यकन्या।।
मत्स्यकन्या कल्पनाविलास नसे तुच्छ्य।।

— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..