नवीन लेखन...

सत्संग

मला एकटे, जगण्याचा सराव नाही
जीवनाचा अर्थ अजुनी कळला नाही

सर्वांच्या, बोटास धरुनी मी चाललो
तोल सांभाळणे अजुनी जमले नाही

भोगले भाळीचे, सारेच दिव्य होते
ऋण! जन्मदात्यांचे विसरलो नाही

हात संस्कारांचे लाभले सदा तारणारे
त्या स्पर्शाला! कधीही भुललो नाही

श्रमलो भिजलो साऱ्या ऋतुचक्रातुनी
वेदनांची, कधीच फिकीर केली नाही

वर्दळ सुखदुःखांची अविश्रांत जीवनी
जगतांना, मी कधीच कुरकुरलो नाही

शिकवण! ठेविले अनंते तैसेची रहावे
उमजुनी सारे, जगण्यास टाळले नाही

फुलुनी, उमलावे, गंधुनीया दरवळावे
या सद्गुणां, अजूनही विसरलो नाही

भाग्यवन्त! मजसी लाभला सत्संग
त्या सत्संगा, कदापि मी भुललो नाही

— वि.ग.सातपुते ( भावकवी)

9766544908

 

१५ – १ – २०२२.

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..