नवीन लेखन...

सरकारनं लाल दिवा काढला, आता हे ही करावं

केंद्र सरकारने काही ठराविक सेवा वगळल्यास सर्वच मंत्री-अधिकाऱ्यांच्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकण्याचा निर्णय घेतला हे अतिशय उत्तम काम केलं. सामान्य जनतेच्या भावना सरकार ओळखू शकलं याचा अर्थ सरकारची जनतेशी नाळ जुळली आहे असा होतो.

आता सरकारने आणखी एक काम करावं. ‘भारत सरकार’ किंवा ‘मबाराष्ट्र शासन’ असं मराठी-इंग्रजीत मागे-पुढे लिहिलेल्या अनेक सरकारी व खाजगी गाड्या दिसतात. या सर्वांवर ‘भारत सेवक’ किंवा ‘महाराष्ट्र सेवक’ असं लिहिणं बंधनकारक करावं. असं केल्याने ‘शासन’ या शब्गाचा जो ‘शिक्षा’ असा अन्य अर्थ सामान्यजणांना वाटू लागला होता, तो नाहीसा होईल व सरकार अधिक जनता फ्रेन्डली झाल्याचा फिल येईल.

माझ्यामते असं सरकारने बॅधनकारक केल्यास निम्म्याबून अधिक ‘सेवका’च्या गाड्या किंवा गाड्यांवरील बोर्ड आणि गाड्यांच्या आतील लोकांच्या चेहेऱ्यावरची मग्रुरी आपोआप नाहिशी होईल (अशी आशा आहे). ‘शासन’ शब्दामधे जी दहशत आहे ती ‘सेवक’ या शब्दांत नसल्याने हे होईल असं मला वाटतं..

पण अस केल्याने आणखी एक होईल अशी भितीही सतावते. गांधीजींनी पूर्वीच्या अस्पृश्य समजल्या गेलेल्या जाती-जमातींना ‘हरिजन’ असा अत्यंत अर्थपूर्ण शब्द दिला होता. असा शब्द सुचवण्यामागे गांधीजींची भावना उदात्त होती यात शंका नाही परंतू या देशातील बिलंदर परंतू मागासलेल्या मानसिकतेच्या लोकांनी ‘हरिजन’ या शब्दालाच काळाच्या ओघात पूर्वीचाच अर्थ मिळवून दिला आणि तिच पूर्वीची परिस्थिती नांव बदलून कायम कशी राहील याची व्यवस्थित काळजी घेतली. असं काही लाल दिव्याचं किंवा मी वर सुचवल्याप्रमाणे नांव बदलाचं होऊ नये, किंबहूना सपकारे तसं होणार नाही याची काळजी घ्यावी.

रुप व नांव बदललं तरी परिस्थिती तशीच राहीली तर त्याला काही अर्थ उरणार नाही आणि याची काळजी सरकारच्या सर्वोच्च अधिकाऱ्यापासून ते चतुर्थ श्रेणी कामगारापर्यंत सर्वांनीच घ्यायला हवी.

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..