नवीन लेखन...

सांजवेळ

बरेच काही माझे पण मालकी कुठेच नाही
जीव जरी माझा तरी त्यावर सत्ता माझी नाही

सारे आपुले म्हणुनी नाती हॄदयी जपत राहिलो
मृगजळ होते सारे आपुले कुणीच भासत नाही

प्रारब्ध भाळीचे अगदी सहजी भोगुनी झाले
आता भोगण्यासारखे तर काहीच उरले नाही

जगताना रोज रोज पाहतो हसरे बेगडी चेहरे
पण निर्मळ प्रसन्न खरा चेहरा कुठेच दिसत नाही

आज या युगी निर्विकार, शुष्क स्पर्श भावनांचे
विकल स्पंदने उध्वस्त भावनां दूजे जीवन नाही

सांजवेळी आता ही गात्रे सारीच कुरकुरती
तोच अनामिक तारणारा दूसरे कोणी नाही
*************

— वि.ग.सातपुते (भावकवी)

(9766544908) 

रचना क्र. ३२५

८/१२/ २०२२

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..