नवीन लेखन...

प्रगल्भ युवा निर्मिती आध्यात्मानेच शक्य !

एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांची ज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपत पडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणारा आपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे.

या पेक्षा आपल्या देशाचे दुसरे कोणते दुर्दैव असावे ? पण आपली एवढी दुर्दशा का व्हावी ? का आपल्याला लोकांसमोर हात पसरायची वेळ यावी ? याचा अजूनही कोणी फारसा गांर्भियाने विचार केलेला नाही किंवा करत नाही. याचे फार आश्चर्य वाटते. जगाला दिव्य ज्ञान देणारे आपण आज इतके दुबळे व षंढ झालो आहोत की, आपण कोण होतो ? कोण आहोत ? याचे जरा सुध्दा भान राहिलेले नाही. हा आपल्या भारत मातेचा अपमान आहे. तिच्या गौरवपुर्ण वारशाचा खुन आहे. हे आपल्याला लक्षात का बरे येत नाही. आपला उज्ज्वल इतिहास वाचून का बरे आपला स्वाभिमान जागृत होत नाही.

युवास्सत: साधु युवाध्यापक: ।
आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ: ॥

उपनिषदात म्हटले आहे की, युवक हा साधु म्हणजे सरळ मनाचा, नविन विचार श्रेणीचा, शिक्षक, निष्कपटी, खिलाडू-वृत्तीचा, गर्व न करणारा, दृढनिश्चयी, अभ्यासू आणि बलवान असावा किंवा असतो. परंतु खेदाने म्हणावे लागते की, आज वरीलपैकी एक ही गुण स्पष्टपणे युवकात आढळून येत नाही. यामुळे आज युवावर्ग दिशाहिन झाला आहे. समाजात युवकांचे स्थान घसरत आहे. आज युवक म्हणजे व्यसनांचा व विकृत्तीचा पुतळा आणि वासनेचा अंगार अशी ओळख बनली आहे. आज समाज घटक त्यातही विशेष म्हणजे महिला वर्ग युवकाकडे दुषित व संशयी नजरेने पाहात आहे.

युवा वर्गाची होणारी ही दशा थांबवून त्यांना दिशा देण्यासाठी, युवकांत वरील श्लोकातील सदगुणांची पुर्नस्थापना करण्यासाठी आज आध्यात्माची अत्यंत आवश्यकता आहे. कारण युवा वर्ग आपली संस्कृती व संस्कार यापासून भरकटला आहे, यामुळेच त्याला ही अवस्था प्राप्त झाली आहे. त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे. हे सर्व पाश्चिमात्य संस्कृतीचे विपरित परीणाम आहेत. यातून युवकांना बाहेर काढण्यासाठी आध्यात्माशिवाय पर्याय नाही. फक्त आध्यात्मातूनच युवकांत मनाची सरलता निर्माण करून, विकार व वासनेचा सर्वनाश करता येईल. मग आपोआप त्यांच्यात आत्मविश्वास, स्वाभिमान, ध्येयनिष्ठा हे गुण प्रकट होतील. यातून मग युवकांना सक्षम बनवून देशाला सर्वश्रेष्ठ बनवणे शक्य होईल. परंतु यासाठी दृढ निश्चय महत्वाचा आहे, जो फक्त आध्यात्मातूनच युवकांत निर्माण होऊ शकतो. म्हणून युवकांनी आध्यात्मात समरस व्हावे. कारण शारीरीक आजार हे बाह्य औषधोपचाराने बरे होतात, मात्र मनातील नैराश्य, न्युनगंड, विकृत्ती यांना दूर करण्यासाठी आपल्याला आध्यात्मालाच जवळ करावे लागेल.

बऱ्याच लोकांना वाटतं की, जवळ पैसा असला म्हणजे सर्व काही मिळते, मात्र जगात सर्वच गोष्टी पैशाने मिळत नाहीत. पैसा हा कधिही सुख, समाधान देऊ शकत नाही. तर त्याने फक्त लोभ वाढत जातो. याचा अर्थ पैसा आवश्यक नाही असा नाही, पैसा ही सुध्दा पाहिजे आहे, पण तो फक्त आवश्यक गरजा भागविण्यापुरताच. पैशाचा अतिरेक नसावा. पैशाचा लोभ हा माणसातील माणुसकी व घराचे घरपण नष्ट करतो. याने लाखों कूटुंबांना उध्वस्त केले आहे. हा धनाचा लोभ फक्त आध्यात्मातूनच नष्ट होतो. केवळ आध्यात्म हेच षडविकारातून बाहेर काढू शकते. आध्यात्म हेच मनुष्याला शांत, संयमी, समाधानी बनवू शकते. ज्याने माणूस संकट दूर करायला, त्याला ध्यैर्याने तोंड द्यायला शिकतो. आध्यात्माने सर्वाविषयी ममत्व, प्रेमभावना वाढिस लागते. आध्यात्मानेच मनुष्य खंबीर बनून अन्यायाविरोधात लढा द्यायला उभा राहतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्या गोष्टी जीवन जगण्यासाठी खुप आवश्यक आहेत, अशा गोष्टी आपल्याला फक्त आध्यात्मातूनच मिळू शकतात. यासाठी आपण बाहेर कितीही पैसा खर्च केला तरी काही उपयोग नाही. पण आध्यात्म आपल्याला या सर्व गोष्टी मुक्तहस्ताने व विनामुल्यपणे देते.

म्हणून युवकांनी कोणत्याही एका आध्यात्मिक मार्गाचा अंगिकार करावा. ज्यातून स्वत:चा व पर्यायाने देशाचा सर्वतोपरी विकास व प्रगती साधेल. आध्यात्माचा सहवासच आपल्याला एक आदर्श नागरीक बनवेल. एक कर्तव्यशील व्यक्ती बनवेल. आध्यात्मच आपल्या विचारात प्रगल्भता आणेल. आपल्या मनगटात हत्तीचे बळ, सिंहाची शुरता आणि गरूडासारखी उंच भरारी घेण्याची क्षमता केवळ आध्यात्मानेच शक्य आहे.

परंतु आध्यात्मिक मार्गाची निवड करताना युवकांनी योग्य ती दक्षता घेणे महत्वाचे आहे. जसा योग्य शिक्षक विद्यार्थ्याचे भविष्य घडवतो, तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शकच आपल्या आयुष्याला योग्य वळण लाऊ शकतो. म्हणून योग्य आध्यात्मिक मार्गाची निवड करावी जेणेकरून नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. आज या मतलबी जगात भामट्या, भोंदु बुवा-बाबांची आणि फसव्या किंवा स्वार्थी लोकांची, आणि त्यांनी चालवलेल्या आध्यात्मिक लुटींच्या दुकानांची काही कमी नाही. सगळी कडे त्यांचाच सुळसुळाट झाला आहे.

तेव्हा अशा तथाकथित बुवा-बाबा, स्वामी, महाराजांपासून सावधान !

— श्री. सुनिल कनले

प्रज्ञापूरचे अक्कलकोट बनवणाऱ्या स्वामींचा सेवक !
अर्थात बुध्दीचा अंहकार नष्ट करून ईश भक्तीची ज्योत पेटवणाऱ्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवकरी !

सुनिल कनले
About सुनिल कनले 16 Articles
श्री.सुनिल कनले हे गेल्या 16-17 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्यांनी परभणी जिल्ह्यातील 70 गावात स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार केला आहे, शेकडो व्याख्याने दिली आहेत. लोकांच्या मनातील स्वामी महाराजांबद्दल असलेले गैरसमज दुर करणे व लोकांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुध्द स्वरूपाची माहिती पोहोचविणे, हे कार्य लेखक स्वामी कृपेने करत आहेत. स्वामी सेवेचा प्रचार करणे व पाखंडी लोकांचे मत खंडण करणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारी नविन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. आळसी माणसाचे तोंड ही पाहू नये ! हे स्वामी वचन कायम स्मरणात ठेवून ही वाटचाल सूरु आहे. लेखकांकडे स्वत:चे असे 1000 ग्रंथाचे वैयक्तिक ग्रंथालय हे त्यांच्या स्वत:च्या वाचन आवडीतून व ग्रंथ संकलनातून निर्माण झालेले आहे. यात 04 वेद, 18 पुराण, धर्मसिंधू, निर्णयसिंधू, मनुस्मृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ, संत चरित्रे, अंभग गाथा, ज्योतिष्य शास्त्रविषयक ग्रंथ, तसेच ईतर अनेक सांप्रदायिक ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ, कांदबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इ. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..