नवीन लेखन...

प्राणीप्रेम

कचरा आणि खरकटे आपल्या घराबाहेर फेकले की आपले घर स्वच्छ होते असा, बऱ्याच नागरिकांचा (गैर) समज झालेला आहे. त्यामुळे होते काय की, उंदीर, घुशी, कावळे, कुत्रे, मांजरी वगैरेंना तो आयताच मिळतो आणि त्यांची प्रजा वाढते. त्रस्त होतात… नागरिक. रोगराईला सामोरे जातात…नागरिक.

या समस्येवर उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने उंदीर मारणारे कर्मचारी नेमले. काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात बातमी आली की, एका प्राणीप्रेमी संस्थेने असे सुचविले की उंदरांना मारू नका फक्त पिंजऱ्यात पकडा. उंदरांना पिंजऱ्यात पकडून पुढे त्यांचे काय करा याविषयी मात्र, या संस्थेने मौन पाळले आहे.

वातानुकुलीत कार्यालयात बसून या संस्थांचे कार्यकर्ते, अशासारखे फतवे नेहमीच काढीत असतात. हे लोक न्यायालयात जावून कुत्र्यांना पकडू नका, त्यांना विष देवू नका, अशा तऱ्हेचे आदेश मिळवितात. या संस्था कुत्र्याचे पांजरपोळ का चालवीत नाहीत? या संस्था, उंदरांना पिंजऱ्यात पकडून, त्यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा का राबवीत नाही? भटक्या प्राण्यांची आणि उंदरांची देखभाल करण्याची जबाबदारी या संस्थांनीच स्वीकारावी. दुसऱ्यांना उपदेश करण्याची आणि उठसूठ न्यायालयात जाण्याची सवय सोडावी. आपले प्राणीप्रेम खरे आहे हे सिद्ध करून दाखवावे.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..