नवीन लेखन...

पोटभरू पाखरू मी

कितीक गावांच्या अंगणात रमलो
स्थिर कुठेच  होऊ शकलो नाही     ||

पोटभरू पाखराची भटकंती ती
दानापाणी सरता थांबू शकलो नाही   ||

भरभरून दिले त्या माणसांनी
घेणेकरी मी देणे फेडू शकलो नाही    ||

मायेचे झरे या माणसांच्या मनात
दुस्वास त्यांचा करू शकलो नाही      ||

साधी भोळी माणसे होती फार ती
माणसांना अंतर देऊ शकलो नाही     ||

भाषा वेगळी अडसर नाही भासला
बोललो भाषा ती लिहू शकलो नाही     ||

उमेदीच्या वर्षात आधार दिला यांनी
कुणालाच विसरू शकलो नाही            ||

त्यांच्या कडून शिकलो थोडे फार
बरोबरी त्यांची करू शकलो नाही          ||

— अरुण वि. देशपांडे – पुणे.
9850177342

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..