नवीन लेखन...

पिसाट वारा

 

दिसा दिसांचे ते भाग्य सरले,
आला ऽ भरुन पिसाट वारा ।
माझा कुणा म्हणू मी,
उरले न मोल आसवांना,
उरले न मोल आसवांना ।।धृ।।

अपुलेच झाले परकेचि केव्हां,
कळले न या वेड्या मनाला ।
तंद्रीतुनि निझेच्या जाग आली,
वेळ केव्हांच होती निघून गेली ।
कवटाळीतो शुष्क भावनांना ।।१।।

दिले भरभरुन हातचे न ठेवुनि,
शल्य ना, भरली ओंजळ आसवांनी ।
घेतला निरोप मृदु भावनांनी ।
भरले आयु, अंतहीन यातनांनी ।।
स्मरणे नित हळव्या स्पंदनांना ।।२।।

वाचा नसे या मनींच्या व्यथेला,
कितीदां समजाविले खुळ्या मनाला ।
घडी मनाची ती, जाउणिना सत्याला,
नसे इलाज आतां नाईलाजाला ।।
दयाघना, दे सामर्थ्य या मनाला ।।३।।
-गुरुदास / सुरेश नाईक
१९ नोव्हेंबर २००९,
१०/११, “राधा-निवास”
मुंबई ४०००८१

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..