नवीन लेखन...

पर्यावरणाची जाणीव

एकनाथराव यांची मला गम्मत वाटते. त्यांची विचारसरणी सतत काहीं तरी क्रियात्मक घटनामध्ये व्यस्त असते. अतिशय छोट्या गोष्टी. मात्र खोलांत शिरलो तर त्यातून एखादे महान तत्वज्ञान कळू लागते.

हे किती क्षुल्लक, मला हे कां सुचले नाही. ह्याची खंत मनांत येते.

सांज समयी एकनाथराव फेरफटका मारीत रस्त्याने चालले होते. एका सोसायटीच्या दारा जवळ कोपऱ्यांत बराच कचऱ्याचा ढीग पडलेला दिसला. सर्व परिसर स्वच्छ केलेला जाणवला. कुणीतरी त्याला जाळून टाकण्यासाठी आग लावली होती. प्रथम थोडासा जाळ झाला. मात्र नंतर त्यांत बराच ओलसर कचरा असल्यामुळे जाळ विझुन गेला व तेथे धुर निघु लागला. बरांच धुर तेथे उत्पन्न होत जणू धुरांडे झाले होते. सर्व परिसरांत तो पसरल्याची जाणिव होत होती. एकनाथराव थोडावेळ तेथे थांबले.सेसायटीत जाऊन चौकीदाराकडे सोसायटीचे अध्यक्ष वा सचिव कोठे राहतात, याची चौकशी केली. त्यालाच घेऊन ते अध्यक्षाकडे गेले.

“ मी एकनाथराव, ज्येष्ठ नागरीक. मी आपणास एखादी विनंती करु का ? “

अध्यक्षानी त्यांच स्वगत केल. त्याना बसण्याची विनंती केली.

“ तुमची सोसायटी स्वच्छ आहे. सध्यातरी कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसत नाही. सर्व कचरा एकत्र करुन जमा केलांत हे ठिक आहे. परंतु तो जाळून टाकण्याचा जो प्रयत्न आहे, तो समाधान कारक नाही. कचरा जळून जाईल, नंतर सर्व राख तुम्ही बागेतील कुंड्यामध्ये टाकणार, हे सारे चांगले आहे. परंतु कचरा ओलसर असल्यामुळे तो धुरांड्याच्या रुपांत रात्रभर धुर ओकत राहील. तुमची सोसायटी व परिसर येथे कार्बनडाय ऑक्साईड वा इतर दुषीत वायु सतत पसरवित जाणार. अधीच परिसरांत प्राण वायु अर्थात ऑक्सीजनचे प्रमाण खुपच कमी होत चालले आहे. त्यांत या प्रदुषण निर्माण करणाऱ्या वायुमुळे विनाकारण भरणा होईल.  अर्थात हे आरोग्यास हानीकारक आहे हे आपणास सांगणे नको. कचरा जाळून टाकण्यापेक्षा तो जमा करुन रोज महानगरपालीकेच्या घंटा गाडींत टाकल्यास त्याचा योग्य विनीयोग होईल. आपण पर्यावरणाला चांगले ठेवण्यास थोडा फार हातबार लाऊ शकू. “

श्री एकनाथरावांचे तर्कशुद्ध व योग्य पर्यावरणवादी विचार, त्यांची अंतरिक तगमग, आणि ज्येष्ठता यांचा न सांगता योग्य परिणाम झालेला दिसला. अध्यक्षांनी ते धुर कणारे धुरांडे स्वतः बाहेर येऊन विझवून टाकले.  वातावरण एकदम स्वच्छ व प्रफुल्लीत भासू लागले. आनंद व समाघानाच्या अद्दष्य लहरी त्या वातावरणात पसरल्याची जाणीव घेत एकनाथराव सोसायटीमधून बाहेर पडले

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..