नवीन लेखन...

न्याहरीची तऱ्हा न्यारी

दोसा असतो कसा छान जाळीदार
मन मोकळे जसे असते त्याचे आरपार
इडली सदाच टम्म फुगलेली.
साधीदार सांबार नसला की असते रुसलेली
खमंग खुसखुशीत आप्पे गोल गोल
गरम गरम असतानाच खाणार किती बोलबोल
आंबट ताकातली खमंग फोडणीत उकड शिजते रटरटा
डोळे मिचकावत खायचे मस्त गटगटा
कुणी म्हणतात उप्पीट तर कुणी ऊपमा
या साठी बऱेच पदार्थ करावे लागतात जमा
शिरा याचा मान तर असतो खूपच मोठा
तूप साखर. बदाम. काजू यांचा असतो ना साठा
साधे सरळ सोपे नाती जुळवणारे कांदे पोहे
कुणीही या कधीही या ते तयारीतच आहे.
सांगा सांगा लवकर सांगा. तुम्हाला काय आवडते ते लवकर सांगा
— सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..