नवीन लेखन...

जिवापेक्षा काहीही मौल्यवान नाही…  

आपल्या देशातील मागील काही महिन्यातील आत्महत्येच्या घटना पाहिल्या तर त्यातील काही आत्महत्या विचार करण्यास प्रवृत्त करणार्‍या होत्या. ज्या आत्महत्या कोणा अशिक्षित व्यक्तीने नव्हे तर चांगल्या उच्चशिक्षित लोंकानी केलेल्या होत्या . त्यांनी फक्त आत्महत्या केलेल्या नव्हत्या तर आत्महत्या करण्यापुर्वी तीन – तीन निरअपराध जिवांचा बळीही घेतला होता. या अशा घटना अजुनही घडत आहेत आणि भविष्यातही घडत राहणार आहेत दुर्दैवाने. पण वाईट या गोष्टीचे वाटते की त्या आत्महत्या करणार्‍या गुन्हेगारांचे समर्थन करणारी एक वृत्तीही समाजात आहे. हे आत्महत्या करणारे तेच पुरुष आहेत ज्यांनी आत्महत्या करण्यापुर्वी आपल्या पत्नीचा आणि मुलांचा खून केला अथवा त्यांनाही आत्महत्येस प्रवृत्त केले. मुले आत्महत्येस तयार होणे शक्यच नाही. त्यामुळे पत्नीला भरीस घातले गेले . बायका मुळातच भावनिक असतात. त्यात त्या असा विचार करतात माझा नवरा मेल्यावर मी काय करू..?  आणि आम्ही मेल्यावर आमच्या मुलांचे काय होणार ? स्वत:च्या चुकीमुळे पुरुषांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली असते. साधारणत: ती चुक कर्जबाजारीपणा ही असते. त्या व्यतीरीक्त त्याच्याकडून कोणती मोठी चूक झाली असेल तर ती त्याची व्यक्तीगत चूक आहे. त्याची शिक्षा त्याच्या बायको – मुलांना देण्याचा नैतिक अधिकार त्यांना कोणी दिला.

पुरुष कर्जबाजारी आपल्या बायका – मुलांना सर्व भौतिक सुखसाधने देण्याच्या नादात होतो. त्यामुळे प्रत्येक बायकोने  आपण आपल्या नवर्‍याकडून त्याच्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त भौतिक सुखांची अपेक्षा तर करत नाही ना ! याचा विचार करायला हवा. पुरुषांनीही कोणासाठीही आपल्या आर्थिक क्षमतेपेक्षा अधिकची भौतिक सुखे आपल्या कुटुंबाला देण्याचा प्रयत्न करु नये. आपण त्यांना अधिकची भौतिक सुखे देण्यासाठी कर्जबाजारी झालो आणि त्यामुळे आपल्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आणि त्यातून आपल्या  मनात आत्महत्तेचा विचार आला म्हणून आपल्या बायका – मुलांचा जीव घेण्याचा अधिकार कोणत्याच पुरुषाला नाही. कोणत्याच जिवावर कोणाचाच मालकी हक्क नाही. जो जन्माला येतो त्याची सर्व तरतुद निसर्गाने अगोदरच करुन ठेवलेले असते. त्यामुळे आपल्यावर कोणाचे अस्तित्व अवलंबून आहे या भ्रमात पुरुषांनी राहता कामा नये. मुळातच निसर्गत: माणसाच्या मुळभुत गरजा इतर प्राण्यासारख्या माफकच आहेत.  पण आपण त्या विनाकारण वाढवून घेतलेला आहेत. ज्या साठी कोणालाही आत्महत्या करायला लागावी असे कारण या जगात अस्तित्वातच नाही. माणसाने स्वत: भोवती जे भौतिक सुखाचे जे जाळे विनले आहे त्या जाळ्यात तो स्वत:ला गुंतवून घेतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही सापडला की आत्महत्या करतो.

एखादा नवरा अपघाताने गेल्यास त्याच्यामागे त्याची  बायका – मुले आत्महत्या करतात का ? नाही करत. त्यामुळे आपल्या मागे आपल्या बायका मुलांचे काय होईल हा विचार करणेच निरर्थक आहे. एका मर्यादेपलिकडे कोणीच तुमच्याकडून काहीच हेरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे आज प्रत्येक पुरुषाने असा विचार करुनच प्रत्येक गोष्ट केली पाहिजे की माझ्यामुळे इतर कोणालाही कोणताच त्रास होता कामा नये. झालाच तर तो मी माझा – माझा तो सहन करायला समर्थ असलो पाहिजे… कोणत्याही माणसाच्या जीवापेक्षा भौतिक सुखे महत्वाची नाहीत… जिवापेक्षा काहीही मौल्यवान नाही…हे आत्महत्या करण्याचा विचार करणार्‍या प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे…

लेखक – निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..