नवीन लेखन...

निसर्ग प्रकोप

घे थोडी विश्रांती आता
घे थोडी उसंत जराशी
आता बरसणे थांब जरा
अश्रू डोळ्यातून बरसती ।
ऊध्वस्त झालीत घरेदारे
ऊध्वस्त झालीत स्वप्ने
ना राहण्यास घर राहिले
ना खाण्यास अन्न ऊरले ।
होते जाणीव पदोपदी आता
नाही निसर्गाची अवकृपा
वृक्षतोडीचा अतीरेक झाला
यात निसर्गाची ना गलती ।
येऊ दे आतातरी जाग मानवा
थांबावा हस्तक्षेप अतीरेकी
सुधारणेच्या नावाखाली आता
ना उजाड व्हावी ही धरती ।

सुरेश काळे
सातारा.
मो. 9860307752
२५ ऑगस्ट २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..