नवीन लेखन...

नरकचतुर्दशी – अर्थात पहिली आंघोळ..

आज ‘नरकचतुर्दशी’.. आपल्यासारख्या चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस असला तरी वसुबारसेपासून सुरू झालेल्या दिवाळसणाचा आजचा तिसरा दिवस..बहूजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस.. नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले असा पुराणांमधे उल्लेख आहे. त्याची आठवण म्हणून आंघोळ केल्यावर तुळशीपाशी पायाच्या अंगठ्याने कारीट फोडण्याची प्रथा आहे.

कोकणातल्या ग्रामीणभागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्यांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे…शहरात याचे शहरात फराळाच्या विविध प्रकारात रुपांतर झाले..शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात, फटाके उडवतात..देवळात जाऊन देवदर्शन करून आल्यावर एकत्र बसून फराळ करतात..हल्ली ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रमही जोरात असतात. मात्र मला तरी घरातलं सणासुदीचं भारलेलं वातावरण सोडून सकाळी लवकर उठून गाणी वैगेरे ऐकायला जायला आवडत नाही..त्याऐवजी मी घरात बसून आई-वडील, पत्नी, मुलांसोबत गप्पा मारणं जास्त पसंत करतो..आपापली आवड, दुसरं काय..!

हा दिवस येणाऱ्या व जाणाऱ्या विक्रमसंवताचा संधीकालातला दिवस..सरते वर्ष भरभराटीचं, समृद्धीचं गेल त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची कृषीसंस्कृतीची ही प्रथा होती..कृष्ण व नरकासुराच्या कथेचा साज त्यास नंतर कधीतरी चढवण्यात आला असावा..

– नितीन साळुंखे
9321811091

पूर्व प्रसिद्ध –
साप्ताहीक लोकप्रभा दि. २८.१०.२०१६

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..