नवीन लेखन...

नक्कीच कुणाततरी हरवावं!

नक्कीच कुणाततरी हरवावं!
नक्कीच कुणी तरी आवडून जावं!
नक्कीच कुणाच्या आठवणीत रहावं!
नक्कीच कुणाच्या मनात मिटून जावं!
नक्कीच कुणाच्या हृदयात राहावं!
नक्कीच कुणाच्या प्रेमात पडावं…
आयुष्य क्षणभंगुर आहे…आज आहे पण उद्याच कुणी बघितलं आहे!! राग यावा तसा लोभ असावा…. माया, ममता, जिव्हाळा जीवनात अंतरी ठेवावा…प्रेम तर सुखद, सुंदर भावना नक्कीच तिच्या, त्याच्या प्रेमात पडावं…तिच्या बोलण्यात, लाजण्यात, स्वरात,शब्दांत, हास्यात मधुर भावनेच्या ओल्याव्यात नक्कीच प्रेम करावं… आज मी आहे उद्या असेल का ? हे प्रत्येक व्यक्ती बाबत सत्य आहे….!
कुणाशी 2 शब्द आपुलकीने बोला, त्यात प्रेम असतं.. कुणाचं भरभरुन कौतुक करा त्यात प्रेम असतं… कुणाची निखळ तारीफ करा त्यात प्रेम असतं…. नाजूक कळीवर प्रेम करा…सुंदर फुलांवर प्रेम करा… उधाणलेल्या सागरावर प्रेम करा… कोसळणाऱ्या धबधब्यावर प्रेम करा… गंधित फुलांवर प्रेम करा.. माणसांवर प्रेम करा.. निसर्गाने मुक्त उधळण केली आहे..
त्या सगळ्यावर प्रेम करा… मनुष्य जन्म दुर्मिळ असा मग राग नकोच तर प्रेमाचा गंध हवा…
केलं तर प्रेम आहे आणि तेच सुंदर आहे….!

— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..