नवीन लेखन...

नातं

काय होतं कुणास ठाऊक देवासंग नातं
अनवाणी चालत कुत्रं वारीला गेलं होतं
पाऊसपाण्यात जरी भिजलं होतं अंग
विठ्ठलाच्या गजरात तरी झालं होतं दंगं…!

चंद्रभागेच्या पाण्यात अंग ओलं केलं
मनात घेऊन वेडा भाव पायरीशी गेलं
दारामागच्या देवाला भेटणार तरी कसं
माणसांपुढे बिचा-याचं झालं होतं हासं.!

माणसाचा देव माणसांसाठी असतो
ज्याच्या खिशात पैसा त्यालाच तो दिसतो
पायरीवर बसून शेपूट हालवू लागलं
देवाला भेटण्यासाठी रातभर जागलं..!

निराश होऊन सकाळी मागे फिरलं
रस्त्यावरचं भटकं म्हणून त्याला धरलं
गाडीत घालून त्याला कुठेतरी नेलं
पाप्यांच्या दुनियेत जिवानिशी गेलं…!!

…. राजेश जगताप, मुंबई
९८२१४३५१२९

राजेश जगताप
About राजेश जगताप 9 Articles
मी एक नवोदित लेखक आहे. माझ्या कथा नियमितपणे "बोलती पुस्तके by Patil sir" या युट्यूब चॅनल वर ऑडिओ स्वरूपात सादर केल्या जातात.. माझे " विळखा The Trap " आणि " आनंदी " हे दोन कथासंग्रह प्रस्तावित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..