नवीन लेखन...

नकळे कुणास काही अंतरमन

नकळे कुणास काही अंतरमन
वेदना अबोध काही वेढल्या,
नकळे भाव मनीचे नाजूक
कुणास नकळे खऱ्या जाणिवा..
त्यात अंतरी विरले भाव कितीक
सोडल्या साऱ्या वेल्हाळ भावना,
त्याच वळणावर तू भावाला अचानक
नकळे काही मी मोहरले एकांता..
घेतलेस तू भाव स्वप्न मिठीत
गुंतल्या तेव्हाच गोड भावना,
विसरुन जावे त्याच वळणावर सारे
परी न विसरल्या मधुर त्या भावना..
चाहूल चांदण्यात एक तारका
तुझा बहर हृदयी रंगून गेला,
जीव साठवणीत रेंगाळता असा
तुझ्या आठवणी न आता पुसल्या..
ओढ लागली तुझ्या आरक्त मिठीची
तुला न भाव अवखळ कळला,
अल्लड अबोध वाटले मी तुजला
खेळ जिव्हारी माझ्यात मिटला..
परतून कधी मी आठवली
एकांत क्षणी सहज तुला,
आठवेल तुज तेव्हा व्याकुळ
माझ्या मधुर खऱ्या भावना..
न कळली तुला मी अशी
तुझ्यात गुंतल्या अलवार भावना,
आठवशील तू मला कधी अवचित
तेव्हा कळतील मिटल्या वेदना..
न भेट तुझी न गाठ तुझी
परी जीव कातर व्याकुळला,
तप्त मोहर तुझ्या मिठीचा
तू अलिप्त कोरडा राहिला..
स्वप्न झुला हा झुलतो मजसवे
झोके माझे झुलले एकांता,
वाट तुझी पाहता अबोल अशी मी
चांदण्या सोबती तरी चंद्रही मजसवे सुना..
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..