नवीन लेखन...

मौनातील काजळ वेदना

मौनातील काजळ वेदना
निःशब्द हृदयात सलते
अनेक दुःखाचे पड आयुष्यात
भोग भोगूनी रडवुनी जाते..
सहज साधे काहीच कधी नसते
आयुष्य कळसूत्री बाहुली असते,
मन रडते उन्मळून आवेगात
जीवन ही काटेरी झाडं बनते..
आयुष्य ही टोकास सहज जाते
नशीब जेव्हा वाईट असते,
कधीच सुखद झुळूक नसते
तप्त बोलांचे घाव जिव्हारी उठते..
नशिबाच्या ललाटी खेळ रंगतो
आयुष्य उध्वस्त एकाकी होते,
दुःखाचा थेंबही अनामिक तेव्हा
मनातील दुःख रडवून आल्हाद जाते..
सहज वाटल्या वाटा सरळ साऱ्या
तरी वाकड्या होतं आयुष्य मिटते,
नशीब असेल वाईट दुःखद अंतरी
निःशब्द वेदना जिव्हारी डसते..
उत्तरायण सुरु होता मग
नजर पैलतीरी आल्हाद लागते,
मरणं असेल सुटका सारी अंतिम
मग पैलडोह वाट नजर पाहते..
आयुष्यातील संचित भोग
न कधी कुणाला सुटणारे,
आनंद डोह पार पैलतीर जावा
बोलावणे हसत डोळ्यांत जमावे..
पैलतीरी डोळे व्याकुळ भाव नजर
दुःख न कळणारे आयुष्य व्यापते,
सजेल यात्रा अंतिम इहलोकी
आनंद क्षण ते एकाकी मन रडावे..
अस्तास जातो सूर्य सांज वेळी
काळोख नभांगणी अवचित दाटतो,
दुःख येतात जीवन भरुन अबोल असे
पैलतीरी जीवन नौका जाता क्षोभ क्षुब्ध होतो..

— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..