नवीन लेखन...

मौन

व्यथा साऱ्याच अंतरीच्या
मौन तुझे गं, सांगुनी जाते
कोण, कुणाचा गं अपराधी
नकळत सारे उमजूनी जाते ।।१।।

वैगुण्य ते प्रीतीमध्ये कुठले
निष्पाप भावनां समर्पणाची
मन्मनी, प्रीती विरघळलेली
सत्य अलगदी ओघळुनी येते ।।२।।

काय लाभले काय हरविले
मनांतरीचे गूढ हितगुज सारे
जळात, जरी प्रहार लाठीचे
काय जलधारा दुभंगुनी जाते ।।३।।

सारीपाट, साराच प्रारब्धाचा
हसत, हसतची सहज रमावे.
आठवांचे ते आभाळ रेशमी
मिटूनीया लोचने कवेत घ्यावे ।।४।।

©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र. १०५.

१० – ८ – २०२१.

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..