नवीन लेखन...

मर्म जीवनाचे

सत्यशाश्वत आणि अशाश्वत
अनुभवल्याविना कळत नाही
सत्यप्रेम म्हणजे काय असतं ?
केल्याविना कधी कळत नाही…

विरह देखील काय असतो ?
भोगल्या शिवाय कळत नाही
सुख, दुःख, वेदना देखील
जगल्या शिवाय कळत नाही…

फक्त मीच, हा व्यर्थ अहंभाव
कधीच, कुणाचा टिकत नाही
परदुःख नेहमी शीतल असते
स्वदुःखाचा दाह साहवत नाही…

जीवन पुर्वकर्माचा हिशेब सारा
चुकविण्या शिवाय पर्याय नाही
प्रेम घेणे, प्रेम देणे मर्म संचिती
त्याविण जीवा मोक्षमुक्ती नाही..

— वि.ग.सातपुते (भावकवी)

9766544908 

रचना क्र. २९०

७/११/२०२२

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..