नवीन लेखन...

मंत्रालय आणि सामान्य माणूस

मला मंत्रालयात काही कामानिमित्त अनेकदा ( नाईलाजाने) जावं लागतं..

तेथील कर्मचाऱ्यांची वागणूक, बॉडी लॅंग्वेज, जनतेला तुच्छ समजण्याची ब्रिटीशकालीन सवय अनुभवली की पुन्हा इथं पाय ठेवू नये असं वाटतं..अगदी ‘माझं सरकार’ आलं असलं तरीही..

मंत्रालयाच्या (नांव बदललं तरी ते सचिवालयच आहे हे कोणीही कबूल करेल) इमारतीच्या रचनेपासूनच सामान्य जनतेची पिळवणूक होते. नक्की कोणत्या मार्गाने जायचे व कोणत्या मजल्यावर हे अनेकदा तीथं जाऊनही कळत नाही.. ‘मेझ’ नांवाच्या भुलभुलैयासारखं आहे सारं आणि मग दलालांचा आधार घ्यावा लागतो..
येवढे कष्ट घेऊन एखादा पोचलाच इप्सित स्थळी तर साहेब मिटींगीत..त्याचा उत्साहच मावळतो आणि सरकारविषयीच्या चिडीच्या खात्यावर आणखी एक गुण जमा होतो..

गेटवर प्रवेश देण्ऱ्याऱ्या हात-गळा सोन्यानं भररलेल्या कर्मचाऱ्यापासून जनतेला तुच्छतेची वागणूक मिळायला सुरूवात होते तर दुसरीकडे काही रुबाबदार मंडळी गेटवरच्याचा सलाम स्विकारत गेटपासशिवाय आत जाताना दिसतात आणि हात-गळ्याला झालेल्या काविळीचं मुळं सापडतं..

कोणत्याही खात्यातील कुठल्याही श्रेणीतल्या कर्मचाऱ्याने अंगावर खेकसल्याशिवाय बोलायचंच नाही असा पण केलेला असतो की काय अशी शंका येते..किंबहूना उद्धटपणा हे एकमेंव क्वालिफिकेशन तिथल्या नेमणूकीसाठी लागत असावं हे माझ तरी ठाम मत झालेलं आहे..जेवढे आपले पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ‘आपले’ वाटतात, तेवढंच प्रशासन ‘सावत्र’ वाटतं यात शंका नाही..अर्थात, सर्वच कर्मचारी तसे नसावेत मात्र मला भेटलेले सर्वच तसे होते यात माझ्या नशिबाचाच दोष असावा..मंत्रालयात नशिब वाईट असेल तरच जावं लागत असावं बहुतेक..नशिबावरचा विश्वास पक्का होतो.

सचिवांना पत्र लिहायचं तर ‘सन्माननिय महोदय’ लिहीणं हे समजू शकतो पण तेच पत्र सचिवाकडून एखाद्या सामान्य माणसाला लिहायचं तर केवळ ‘महोदय’ असं का? या वर माझा एकदा वादही झाला होता. कर्मचाऱ्यांचं म्हणणं, की सचिव ‘सर्वोच्च’ व त्यामुळे ते सन्माननिय आणि जनता ही केवळ महोदय वा महोदया..मी त्याला सुनावलं की सचिव तुझा साहेब असला तरी जनतेचा नोकरच आहे व जनतेला ‘सन्माननिय’ म्हटलं गेलं पाहिजे..

इथे विषय संबोधनाचा नाही तर जनतेकडे प्रशासन काय नजरेने पाहातं त्याचा आहे..फार चिड आणणारं आहे सर्व..

— गणेश सांळुखे

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..