नवीन लेखन...

मनाच्या तळ्यात कितीक सल भिजले

मनाच्या तळ्यात कितीक सल भिजले
दाटले उमाळे भाव निःशब्द गहिरे
साचले अश्रू खोल गहिऱ्या जाणिवांचे
डोळ्यांत अश्रुंचे ओंथबले पाट कित्येक ओले
काहूर मन कितीक कढ अंतरी मिटवले
वणवा पेटतो वनी पानांचे हिरवेपण जळते
मेलेल्या भावनेत नवं संजीवनी न येते
पसरुनी वणव्यात दाह करपून होरपळे
न फुलतो वसंत बहरात कधी कुठे
न पाने फुले मोहरुन न पुन्हा उमले
फुलांचे न दुःख कुणास कधी कळे
गंध फुलांचा उडता फुलं एकाकी रडे
आनंदाच्या झुल्यावर कळ्यांचे मोहक झुले
सुखात बरसे सर सारी दुःखाचे भाव वेडे न कळे
शब्दांचे भाव भावनांचे मन मनाचे बोल न कळे
वाऱ्यावर विरले बंध सोनेरी मनाचे तळ कोरडे
फसव्या क्षणांचा मोह होता हळवा जीव व्याकुळे
जीवनाचे बहरणे आनंदी सभोवती कुणाला काटे मिळे

— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..