नवीन लेखन...

क्षणभंगुर जीवन

कधी उमजणार तुला मनुजा
क्षणक्षण सरतो जीव आपुला
जीव हा क्षणभंगुर, अशाश्वत
क्षणाचाही नाही इथे भरवसां ||१||

तरी मुक्तनिर्बंधी जगतो आपण
भौतिक सुखात, बेधुंद अविरत
परिणामाचीही, न करता चिंता
अविचारी, हा विनाशी भरवसां ||२||

जे जे पेरावे, ते ते इथेच उगवते
जे जसे करावे तसेच इथे भरावे
हीच तर असते, नियतीची रीती
समजुनिया मनुजा वाग जरासा ||३||

प्रीतीतुनी, तर सारी सृष्टी फुलते
वासल्याविण, दूजे कुठले अमृत
साऱ्यांच्या मनामनात सदा रहावे
तृप्त कृतार्थतेचा, पेरूनी वारसा ||४||

जे जे आहे, ते ते मुक्त देत रहावे
सहृदयता,अंतरी जपावी निरंतर
मानवतेचाच, तोच एकची रे मंत्र
ध्यास! हृदयांतरी तोची असावा ||५||

— वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र. ११. 

११ – १ – २०२२.

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..