नवीन लेखन...

कालाय तस्मै नमः

हल्ली एक सगळीकडे –
नवीनच फॅड झालंय,
भावनांना समाजाच्या –
खूप महत्त्व आलंय.

कशामुळे दुखावतील त्या –
नाही सांगता यायचं ,
शक्यतो आपण आपलं –
सांभाळून बोलायचं.

जाती पक्ष नेते –
So called आदराची स्थानं,
कुणाहिसाठी कडवी होतात –
यांची बेताल मनं.

दुखावली की चालून येते –
झुंड अविचारी अंगावर,
सपशेल शरणागतीशिवाय पर्याय –
काहीच नसतो यावर.

पूर्वी चर्चा करून बोलणी –
मार्ग तरी निघायचा,
फारच धरलं ताणून तरी –
वादविवादाने सुटायचा.

हल्ली मात्र बोलण्याचं काम –
करतात दोन्ही हात ,
हमरीतुमरीवर येऊन कधीही –
दणादण सुरू करतात.

प्राण ओवाळून टाकावा असं –
कुठेच नाही दिसत कुणी,
जावं भरून विचारांनी असं –
काहीच पडत नाही कानी.

डोळे कान तोंड आवळून –
समोर घडणारं पहात रहा,
विषण्ण होऊन फक्त म्हणायचं –
कालाय तस्मै नमः .

प्रासादिक म्हणे

–प्रसाद कुळकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..