नवीन लेखन...

जन्माला आलो तर

जन्माला आलो तर
मरणं ही ठरलेलं आहे,
कुणाचं लवकर जाणं
हे विधिलिखित आहे
कोण कसं लवकर गेलं
ही हळहळ व्यक्त होते,
आयुष्य असेल थोडं
तर नशीब ही रुसते
लहान मोठं वय ह्याचा
संबंध मग राहतं नाही,
मरणदारी नौका जाणं
सत्य मग टळत नाही
किती करा टेस्ट आणि
किती खा गोळ्या,
हृदय बंद पडेल कधी
न कळेल वेळ तेव्हा
कोण न ह्याला अपवाद
न कोण ह्यातून सुटला,
क्षण भंगुर आयुष्य हे
न रहावा कधी राग रुसवा
मी ही जाईल अशी अचानक
हृदय हलकेच बंद पडता,
काव्य हृदयावर करता करता
धडधड वाढेल मग तेव्हा
नसेल भरोसा कसला तो
कोण जाईल सोडून केव्हा,
आठवणी उरतात मागे साऱ्या
ह्यालाच उत्तरायण म्हणतात
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..