नवीन लेखन...

गोविंद मोरेश्वर पेंडसे उर्फ आप्पा पेंडसे

गोविंद मोरेश्वर पेंडसे उर्फ आप्पा पेंडसे यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९१० रोजी बडोद्याजवळील व्यास गावी झाला.

आप्पा पेंडसे यांचा जन्म बडोद्यात झाला असल्याने गुजराती भाषेतून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. घरातील आर्थिक अडचणीमुळे त्यांना नोकरीच्या शोधात ते मुंबईला आले. मुंबईत आल्यावर त्यांनी वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश केला. ‘विविधवृत्त’, सिनेसाप्ताहिक तारकांमध्ये उपसंपादक, संपादक अशी कामे त्यांनी केली. त्याचबरोबर निर्माते दादासाहेब तोरणे, बाबूराव पै, पांडुरंग नाईक, मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर यांसारख्या नामवंत कलाकारांच्या प्रदीर्घ मुलाखती घेतल्या व त्या प्रसिद्ध केल्या. नर्मविनोदी आणि तिरकस शैलीने त्यांनी विविधवृत्त साप्ताहिकातून चित्रपटांची परीक्षणे लिहिली. त्यांच्या लेखणीने चित्रपटांच्या परीक्षणात एक स्वतंत्र ठसा उमटला होता. त्यांची परीक्षणे त्या काळात खूपच गाजली होती. पुढे त्यांनी लोकसत्तामधून ‘एक्स्प्रेस टॉवर’वरून आणि महाराष्ट्र टाईम्समधून ‘हजरत सलाम घ्यावा’ अशा लोकप्रिय लेखमाला लिहिल्या.

आप्पा पेंडसे १९५८ सालात मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. तसेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा होता. बाबूराव पै यांच्या ‘चूल आणि मूल’ या चित्रपटात ते नायक म्हणून चमकले. तसेच ‘झंझावात’ आणि ‘जन्माची गाठ’ या चित्रपटांतही ते प्रमुख भूमिकेत होते.

आप्पा पेंडसे यांनी मुंबई दूरदर्शनवरून दादा साळवी, वनमाला, स्नेहप्रभा प्रधान इत्यादी चित्रपट कलावंताच्या मुलाखती घेतल्या. त्या प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिल्या होत्या.

आप्पा पेंडसे यांचे २६ जून १९८० रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट/द.भा. सामंत/विवेक चरित्रकोश

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..