नवीन लेखन...

गोठ

ना आई ना सूनबाई होते, ना राजाची पटराणी होते !

इवल्या मायेच्या राजवाड्यात, गोड बाबांची नकटी राजकुमारी होते !!१!!

हसवून खिदळून घर सजत होते, दिवसांमागून दिस घेत होतें झोके,

झोक्यानेही भुर्रकन हिंदोळा घेतला, लग्न आकाशी तो जाऊनी ठेपला !!२!!

कन्यादानाचे त्यांसी पुण्य लाभले, मंगळसूत्राने साजरे रूपही सजले,

ललना सुंदरी सुवासिनीं नटले, किंतू अंतरपाटने अंतर दूरवर ओढले !!३!!

आईची परी पाठवणीत आश्रूंनी भिजली, बाहुली बाबांची हृदयातच निजली,

खळी गालांवरची ओठांत मिठली, मायेची ममता हुंदक्यात थटली !!४!!

मग माझ्याच घराचे बारसे जाहलें, माहेर म्हणवून पाहुणी बसवले,

हक्काच्या सदनीं पाहुणचार लडिवाळला, चार दिवसांत परतीचा निरोप गोंजारला !!५!!

माप ओलांडता लेक परके धन झालीं, नाळ कपल्याची वेदना मज तेव्हा बोचलीं,

कुठलं माहेर अन् कुठलं सासर होत? पोरकेपणात गुंफवणारी होती रेशीम गोठ !!६!!

— कु. श्वेता काशिनाथ संकपाळ.

” गोठ ” (१२/११/२०१९)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..