नवीन लेखन...

सुहास्य-वचने तुमच्यासाठी

हास्य हे सर्वच आजारांवर रामबाण उपाय आहे. चेहर्‍यावर ओढूनताणून हसू आणता येत नाही. पण ही सुहास्यवचने आपल्याला नक्कीच हसायला लावतील..

दारुबाज नवरा त्याच्या बायकोला म्हणत असतो….. `मी नेहमीच दारूला नको म्हणत असतो …… पण काय करू, ती माझं ऐकतच नाही.’

फॅमिली कोर्टातला वकील त्याच्या अशीलाला सांगत असतो….. `घटस्फोटाचं एक महत्वाचं कारण असतं …….. लग्न’

अयशस्वी माणूस नेहमी म्हणतो …. `ज्या वेळी मला यशाची गुरुकिल्ली सापडते … तेंव्हा कुणीतरी त्याचे कुलूप बदललेले असते.’

मधूमेह (डायाबेटीस) झालेला माणूस नेहमीच म्हणतो …. `आयुष्याचा काय भरंवसा …. स्वीट डिश आधी खाऊन घ्या.. ‘

मार्केटिंगच्या क्लासमधला शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो …..  `कुणाला काही पटवून देऊ शकत नसाल ……  तर त्याला गोंधळात टाका.’

आता हास्ययात्रेतील ही आणखी काही सुहास्य-वचने वाचा…

जर तुम्हाला रस्त्यातल्या सगळ्या वस्तूंचा अडथळा होत असेल …. तुम्ही चुकीचा रस्ता धरला असेल.

बोगद्याच्या टोकापाशी दिसणारा उजेड ….. समोरुन येत असलेल्या गाडीच्या दिव्याचाही असू शकतो.

गालातल्या गालात हसून घ्या ……  का हसताय याचा विचार करण्यात लोकांचा गोंधळ उडेल.

तुम्ही जमीनीवर दोन्ही पाय घट्ट रोवून उभे रहाल तर ……. पँट कशी घालाल?

तुम्ही वेळेवर पोचाल …… ते पहायला तिथे कोणीच असणार नाही.

कड्यावरून कोसळत असतांना कोणाचा जीव जात नाही …. खाली गेल्यावर अचानकपणे पडणे थांबते तेंव्हा जीव गेलेला असतो……

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..