नवीन लेखन...

गोमंतकीय कोकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित

गोमंतकीय कोकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित यांचा जन्म ६ एप्रिल १९१७ रोजी रायबंदर गोवा येथे झाला.

गोमंतकीय लोकगीते आणि लोककथांचे अभ्यासक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या कविता म्हणजे अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारी सुक्तेच आहेत.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गोव्यात. त्यांचे नंतरचे शिक्षण पुण्यात, फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. १९४५-४६ या काळात रघुनाथ विष्णू पंडित हे महात्मा गांधींच्या सहवासात होते. १९४५ साली महात्मा गांधींच्या सान्निध्यात राहून त्यांनी त्यांची अनेक छायाचित्रे घेतली. १९५०–५४ मध्ये त्यांनी मुंबईत भारती या आंतर-भारतीय मैत्रीला वहिलेल्या मराठी नियतकालिकाचे संपादन केले. १९६१ मध्ये गोव्याच्या मुक्ती नंतर ते गोव्यात येऊन स्थायिक झाले. गोमंतकीय लोकगीते व लोककथा यांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. १९५२ मध्ये कोकणीतून लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली. आयले तशें गायलें. म्हजें उतर गावड्याचें, उत्तरलें तें रूप धरतलें, धर्तरेचे कवन व चंद्रावळ हे त्यांचे पाच कवितासंग्रह एकाच वेळी (१९६३) प्रसिद्ध झाले. रेवेंतलीं पावलां (१९६९), मोगाचे आंवडे (१९७४), मोतयां (१९७४), ल्हारां (१९७४), नाच रे मोरा (१९६५), दर्या गाजोता (१९७६) हे त्यांचे इतर काव्यसंग्रह होत. मुलांसाठी त्यांनी रामायण व महाभारतातील कथाही लिहिल्या आहेत. रत्नां्हार (कोकणी कवितांचे संकलन–१९७६) व गोअन पोएट्री (१९७६) ही त्यांनी अनुक्रमे कोकणी व इंग्रजीत संपादून प्रसिद्ध केलेली काव्यसंकलने होत. स्वतःच्या ‘भगवती प्रकाशन’ संस्थेतर्फे त्यांनी आजपर्यंत सु. ३० पुस्तके प्रसिद्ध केली आहेत.

पंडितांच्या बहुतेक कविता मुक्तच्छंदात्मक आहेत. गावड्यांच्या कोकणीत लिहिलेल्या त्यांच्या काही कवितांत जोष-जोम आहे. गरीबदुबळ्यांवर होणाऱ्या अन्यायाला ते आपल्या काव्यातून वाचा फोडतात, गोमंतकाचे सृष्टिसौंदर्य मोठ्या कौशल्याने वर्णितात, तर कधीकधी हळुवारपणे आपल्या प्रेमकाव्यातून विरहाची व्यथाही व्यक्त करतात. संपन्न शब्दभांडार, सहजसुंदर व परिणामकारक शैली, प्रतिमांचा मनोहर विलास, विचारांची घार व भावनेची उत्कटता यांमुळे त्यांच्या काव्याला एक आगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या ल्हारां व मोतयां या संग्रहांना गोव्याच्या कला अकादेमीची अनुक्रमे १९७४ व १९७५ मध्ये पारितोषिके मिळाली आहेत. त्यांच्या कवितांचे इंग्रजी, हिंदी व कन्नड भाषांतही अनुवाद झाले आहेत. कोकणी कवींत त्यांचे स्थान विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. मुक्तछंदातून काव्यलेखन करणा-या रघुनाथ पंडितांच्या ‘ल्हारा’, ‘मोतया’ या काव्यसंग्रहांना गोवा कला अकादमीचे पुरस्कारही लाभले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..