नवीन लेखन...

गझल

गझल

  • वृत्त :- आनंदकंद

समजून देव ज्यांना मी पूजले कितीदा
देवून दु:ख त्यांनी मज रडवले कितीदा

आलीच ना कधी ती भेटायला मला पण
स्वप्नातही तिने मज झिडकारले कितीदा

नादात मी गझलच्या समृद्ध फार झालो
सौख्यास या अनोख्या उपभोगले कितीदा

युद्धात सांडलेल्या रक्तास पाहताना
जिंकूनही स्वतःला धिक्कारले कितीदा

भेटेल ती उद्याला सोडू नकोस आशा
या बावऱ्या मनाला समजावले कितीदा

खाणीत कोळशाच्या नाही हिरा मिळाला
काळेच हात झाले मी खोदले कितीदा

देवासमान वैद्या मी मानतो तुला रे
दुखण्यामधून मोठ्या तू तारले कितीदा

© जयवंत वानखडे,कोरपना

Avatar
About Jaywant Bhaurao Wankhade 13 Articles
मी स्वेच्छा सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून कविता लेखन करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..