नवीन लेखन...

गरज

शब्द उमजावेत, लागू नयेत हे खूप गरजेचं आहे.
संबंध संभाळावे, मनं सांभाळावीत हे खूप गरजेचे आहे.
कितीही पुढे निघून गेलो तरी वेळ असेपर्यंत
परतून येणे हे खूप गरजेचे आहे.
लांबी मोजून काय करायचंय ह्या जीवनाची?
दुःखाचे दिवस वेगाने व सुखाचे दिवस हळू हळू
जावेत हे खूप गरजेचे आहे.
शेवटी राखेत मिसळून जाणार ही जाणीव असतानाही
धावत राहणे, कारण दीप मालवेल त्या आधी
प्रकाशून जाणे हे खूप गरजेचे आहे.
मैत्रीचे क्षेत्रफळ मोजायचे समीकरण वेगळे असू शकते.
लांबी रुंदी मोजण्यात, खोली विसरून चालत नाही.
संवाद साधता आला नाही तरी एकमेकां बघताच
डोळ्यांतली चमक बोलावी हे खूप गरजेचे आहे.
हसतां रडतां, पडतां उठतां, अस्तित्व असेतोवर
व्यक्तीने संघर्ष करत रहाणे हे खूप गरजेचे आहे.
शब्द उमजावेत, लागू नयेत हे खूप गरजेचे आहे.
संबंध सांभाळावे, मनं सांभाळावीत हे खूप गरजेचे आहे.

– सौ. संध्या जोशी

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..