नवीन लेखन...

माजी केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर यांचा जन्म ३० जानेवारी १९५१ रोजी पुणे येथे झाला.

पुणेकर असलेले प्रकाश जावडेकर हे गेली कित्येक वर्षे भाजपा, जनसंघ आणि रा.स्व. संघाचे कट्टर कायकर्ते आहेत.

१९७१ ते १९८१ दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीला होते. आाणिबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. त्यांचे वडील केशव कृष्ण जावडेकर हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते आणि नेते होते. प्रकाश जावडेकर यांनी पुणे विभागातून दोन वेळा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले. ते महाराष्ट्र सरकारच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही होते. महाराष्ट्र भाजपाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी अनेक वर्षे सांभाळल्यानंतर त्यांना केंद्रात बोलावून घेण्यात आले आणि केंद्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. तब्बल तीन निवडणूकांमध्ये त्यांनी पक्षप्रवक्त्याची जबाबदारी सांभाळली.

२०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे पर्यावरण आणि माहिती नभोवाणी खात्यांचे स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्रीपद सोपविण्यात आले. त्यांनी केंद्रात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री म्हणून काम केले आहे. सध्या ते पक्षासाठी कार्यरत आहेत. कोणत्याही प्रकारचा राजकीय गॉडफादर त्यांच्या पाठीशी नसतानाही एक सामान्य कार्यकर्ता ते केंद्रात मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांची निष्ठा, तळमळ आणि चिकाटी यांचे दर्शन घडवितो.

केंद्रीय पर्यावरण मंत्री या नात्याने महाराष्ट्राची अनेक वर्षे रखडलेली अनेक प्रकल्यांच्या मंजूरीची कामे त्यांनी मार्गी लावली. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीत त्यांचा मोठा सहभाग आहे आणि महाराष्ट्र त्यांच्याकडे नेहमीच आदराने पहात राहील.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..