नवीन लेखन...

एकांत

विझवून दीप सारे ये प्रिये माझ्या कुशीत
वाट तुझी पाहतो मी पाहू नकोस आता अंत ।

झोपली गाय गोठ्यात झोपे वासरु पुढ्यात
समई देवापुढील ही झालीय आता शांत ।

विरह अपुला संपण्याची जवळ आली घडी
किती दिसानी सखे ग आज मिळे एकांत ।

नेसून ये भरजरी शालू माळून केसात गजरा
नसे ठाऊक पुन्हा कधी लाभेल असा एकांत ।

शिसवीचा पलंग सखे आतूर तुज भेटण्याला
आनंद सखे त्याचा न मावतसे या गगनात ।

सजला तो बकुळ फुलांनी स्वागतास सिध्द झाला
होईल स्वप्नपुर्ती त्याची सखे आपुल्या मिलनात ।

ये ग सत्वरी आता नको धरु शंका मनात
होईल मीलन अपुले मिळता नजर नजरेत ।

अधराशी मिळता अधर विसर पडेल या जगाचा
दोन शरीरांचे होईल मीलन दोन हृदये एक होता ।

— सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
२८ आक्टोंबर २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..