नवीन लेखन...

अर्थशास्त्र

कणकण भारत कोसळताना पाहुन अंतरी कळवळला।
कौटिल्याचा ज्ञानदिप तो मार्ग दावितो आम्हाला॥धृ॥

सिमेवरती उभा सिकंदर फिकीर तयाची कोणाला ।
धनानंद हा तुकडे फेकुन जमवीत बसला श्वानांना।
नंदकुळाचा नाश करीन मी भिष्म शब्द तो धगधगला।।१।।

जिंकाया जग इर्षा धरुनी समरांगणी तो तळपतसे।
सिंकदराला विश्वविजेता कोण मूढ तो म्हणवितसे।
गर्व तयाचा चाणक्याने सिमेवरती उतरविला।।२।।

राजनितीचे सुत्र नवे मग विश्वपटावर मांडियले
अखंड भारत पाहीन डोळा शब्द कृतीतुन अवतरले।
सेल्युकस मग सिमेवरती काही मिनिटांत लोळविला॥३॥

कसे नियंत्रित राखावे या राष्ट्राला मग एकवटुन।
सुत्रबध्द ते केले सारे ज्ञान आपुले ग्रंथातुन।
अलौकिक तो अजुनी आहे ग्रंथ जगातील ठरलेला॥४॥

– रणजित हिर्लेकर

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..