नवीन लेखन...

दुर्वा/श्वेत दुर्वा

।। गजाननाय नम: श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि ।।

गजाननप्रिय दुर्वा खरोखरच तन मन शांत करायचे महत्त्वाचे कार्य करते.

ह्याचे जमीनीवर पसरणारे बहुवर्षायू क्षुप असते.अनेक पर्व असणारे व ह्या पर्व संधी जवळ उगवणारी मुळे ही पुन्हा जमीनीत शिरतात व पुन्हा वाढतात व पसरतात.ह्याची पाने १-१० सेंमी लांब असून,फुले हिरवी अथवा वांगी रंगाची एका मंजीरीत २-८ असून मंजीरी १-८ सेंमी लांब असतात.बिया अगदी बारीक पिंगट रंगाच्या असतात.

ह्याचे उपयुक्तांग पंचांग आहे.

आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:
ह्याची चव तुरट,गोड,थंड गुणाचे असून हल्के असते.ही कफपित्तनाशक अाहे.

चला आता ह्याचे शरीराला काय फायदे आहेत ते जाणून घेऊया:

दुर्वाचा लेप हा आघात,जखम,व्रण ह्यात लेप केल्यास डाग कमी होतात व वर्ण सुधारतो.

डोळ्यांची आग होत असल्यास दुर्वा फायदेशीर आहे.

शरीरात वाढलेली उष्णता कमी करायला उपयुक्त आहे.

स्त्रियांच्या अंगावर लाल अथवा पांढरे जात असल्यास दुर्वारस फायदेशीर ठरतो.

दुर्वा गर्भाशयाची शक्ती वाढविते.

वारंवार तहान लागणे,उल्टी होणे ह्यात देखील दुर्वा उपयुक्त आहे.

मनाला शांत करणे हा अलौकिक गुण ह्या वनस्पती मध्ये आढळतो म्हणूनच तर गणपतीला ह्या वाहिल्यास आपले ही मनशांत होते.

(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९६०६९९७०४

वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर 202 Articles
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..