नवीन लेखन...

दिवाळी आठवणीतली!

नवरात्र संपून दसरा उजाडायचा ,
आणि वेध लागायचे दिवाळीचे.
मधला काळ पंधरा दिवसांचा ,
पटकन संपून जावा वाटायचे.
चिवडा , लाडू , चकली ,शेव
सारेच तेव्हा घरी बनायचे.
विकतच्या घरगुती फराळाचे पेव ,
तेव्हा बाकी होते फुटायचे.
अप्रूप होतं नवीन कपड्यांचं ,
नवीन शर्ट आणि नवीन पॅंटचं .
आम्हाला मनासारखं सगळं मिळायचं ,
तुमच्यासाठी काय घेतलं विचारायचं –
आनंदात नेहमीच राहून जायचं.
फटाक्यांची भावंडात विभागणी व्हायची ,
मिळाले ना सारखे ? नजर असायची.
हवेत मस्त थंडी फुलायची ,
भल्या पहाटे जाग फटाक्यांनी यायची.
गोधडीत गुडुप्प झोपावं वाटायचं ,
कशाला इतक्या लवकर उठायचं ?
अचानक यायचा उटण्याचा सुवास ,
बंबात टाकलेल्या जळणाचा वास.
डोळ्यावरून झोप अलवार उडायची ,
झिरमिळ्या कांदिलाकडे सहज नजर जायची.
सुंदर रांगोळी काढलेली पाटाभोवती ,
पाटासमोर तेल उटण्याची वाटी.
आईचा हात उटण्याचा घमघमाट ,
मोरीत जाऊन उभं राहायचं ,
कडकडीत पाणी अंगावर घ्यायचं .
थंडी पळून कुठच्या कुठे जायची –
नजर नव्या कपड्यांकडे असायची.
गोविंदा गोविंदा !म्हणून कारीट फोडायचं ,
कडूढाण बोट जिभेला लावायचं.
धूम पळायचं फटाके वाजवायला ,
अनार , लवंगी , भुईचक्र लावायला.
भूक वाढलेली असायची पोटात ,
फराळाची चित्र तरळायची डोळ्यात.
पाटावर रांगेत सारी बसायची ,
ओवाळणी अन्नपूर्णेच्या हातून व्हायची.
पोहे ,फराळ हाणायचे मस्त ,
तुडुंब तृप्तीने पोट व्हायचे सुस्त .
सारेच एकत्र देवळात जायचे ,
जिथे पहावं तिथे प्रसन्न वाटायचे.
शेवटचा दिवस भाऊबीज यायची ,
दिवाळी संपल्याची जाणीव व्हायची.
आणि आठवायचा अभ्यास सुट्टीतला ,
दिवाळीच्या आनंदात विस्मृतीत गेलेला.
आता हे काहीच होत नाही ,
पहाटेचं अभ्यंगस्नान दिसतच नाही.
फराळ कंदील सारे विकतचे ,
साच्यातून काढलेले एकाच चवीचे.
व्हॉट्सॲप वर हॅपी दिवाळी म्हणतात ,
मेसेज फॉरवर्ड करत रहातात.
असो ! जीवनाच्या वाटेवर चालायलाच हवं ,
बदलत्या वातावरणाबरोबर बदलायला हवं.
तरी त्या दिवाळीची मित्रानो , आठवण होते अनावर ,
का हो ! काहीच उपाय नाही का यावर ?????
ही दिवाळी आठवते का ? नक्की कळवा !
प्रासादिक म्हणे
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..