नवीन लेखन...

चंद्रयान २ व डिस्कव्हरी

काल संध्याकाळी आमच्या कट्यावर चंद्रयानाचा विषय नसता तर ते फार मोठे आश्चर्य झाले असते .
आमच्या ग्रुपमध्ये बहुतेक सर्व इंजिनिअरस् आहेत . जोरात चर्चा सुरू होती .

यान नक्की कशामुळे कोसळलं , एकंदर प्लानिंगमधे इस्रोच्या शात्रज्ञांच्या काय चुका झाल्या , त्यांनी काय केलंअसतं तर यान व्यवस्थित चंद्रावर उतरलं असतं , ह्याबाबत अगदी दणकून चर्चा झाली प्रत्येक जण आपण ह्या विषयातील सर्वश्रेष्ठ तज्ञ आहोत अशा अविर्भावात तावातावाने बोलत होता

आमच्या ग्रुपमधे एक रिटायर्ड ex B.A.R.C. शास्त्रज्ञ आहेत . बर्याचवेळाने त्यांच्याकडे सगळ्यांच लक्ष गेलं .
आता पर्यंत ते गप्प बसून होते .ते अगदी शांतपणे म्हणाले , ‘ आमच्या क्षेत्रात अशा घटना नेहमीच होत असतात तेव्हा इतकं अपसेट व्हायची गरज नाही फेल्यूअर अनेलिस करणं हा संशोधनाचा अविभाज्य भाग आहे . पहिल्या झटक्यात यश मिळालं तर आम्ही त्याला miracle समजतो .

मी मात्र ह्या बाबतीत कोणतेही भाष्य करणार नाही कारण तो माझा विषय नाही.
मंडळी , मला सांगायला आनंद वाटतो की काल मी एक फार मोठी डिस्कव्हरी केली व लगेच वेळ न दवडता मोदीजींना कळवून ही टाकलं . वाईटातून चांगलं निघतं ते असं!

‘ कचऱ्यात हरवलेली काही रत्ने मला सापडली आहेत त्यांचे मोबाईल नं मी पाठवत आहे ‘ ह्या माझ्या sms ला त्यांचा लगेच रिप्लाय आला

‘ सध्या सफाई अभियान जोरात चालू आहे . ही अनमोल रत्ने कचऱ्यात हरवून गेली असती तर आपल्या देशाची अपरिमीत हानी झाली असती तुमच्यामुळे ही देशाला मिळाली त्याबद्दल देश आपला सदैव ऋणी राहील ‘ .

मंडळी ,चंद्रयान 3 हे शंभरटक्के व्यवस्थित चंद्रावर उतरेल तेव्हा सर्वात आधी माझे आभार मानायला विसरू नका !

© सुहास टिल्लू
08 /09 /2019

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..